शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांनो, आमचा ऊस घ्या हो ऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:24 IST

यावर्षी जवळपास सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा कायगावातील उसाची मागणी घटली आहे. दरवर्षी कायगाव परिसरात ऊस खरेदीसाठी राज्यभरातील कारखानदारांमध्ये चढाओढ दिसून येत होती. मात्र, यावर्षी येथील बळीराजावर ‘ऊस घ्या हो ऊस!’ असे कारखानदारांना म्हणण्याची वेळ आली आहे.

तारेख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककायगाव : यावर्षी जवळपास सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा कायगावातील उसाची मागणी घटली आहे. दरवर्षी कायगाव परिसरात ऊस खरेदीसाठी राज्यभरातील कारखानदारांमध्ये चढाओढ दिसून येत होती. मात्र, यावर्षी येथील बळीराजावर ‘ऊस घ्या हो ऊस!’ असे कारखानदारांना म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, कारखानदार प्रतिसाद देत नसल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे.गोदावरी नदीकाठी असलेले कायगाव, जुने कायगाव, लखमापूर, अंमळनेर, गणेशवाडी, पखोरा, भेंडाळा, धनगरपट्टी, अगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब आदी भागांत सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टर ऊस दरवर्षी उपलब्ध असतो. यंदाही चांगला पाऊस पडल्याने या भागात सुमारे तीन लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होता. मागच्या वर्षी याच ३ लाख मेट्रिक टन उसावर अनेक साखर कारखान्यांनी आपले गळीत हंगाम कडेस नेले होते.गतवर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि उसाच्या कमतरतेच्या गेल्या हंगामात अनेक साखर कारखान्यांनी कायगाव भागातील ऊस उत्पादक शेतकºयांची मनधरणी केली होती. मात्र, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे चित्र पालटले आहे. कायगाव परिसरातील शेतकºयांवरच कारखानदारांची उसासाठी मनधरणी करण्याची वेळ आली आहे.कायगाव परिसरात उसाच्या हंगामाच्या सुरुवातीला एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील किमान १५ आणि इतर जिल्ह्यांतील ५ ते ६, अशा २० हून अधिक खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी कार्यालये सुरू केली होती. मात्र, जसजसा हंगाम पुढे गेला तसतसे कारखान्यांनी या भागवरचे लक्ष कमी केले. पुढे परिस्थिती एवढी बिकट झाली, की ऊस उत्पादक शेतकºयांना आपला ऊस कारखान्याला देण्यासाठी कारखान्याच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागले. काही भागात तर ऊस उत्पादक शेतकºयांना स्वत:च मजुरांची व्यवस्था करून ऊस तोडून कारखान्यात नेऊन टाकावा लागला आहे. आजही या भागात तोडणीअभावी शेतात ऊस उभा आहेउसाच्या मोबदल्यासाठी फरपटहंगामाच्या सुरुवातीला शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांनी साखर कारखानदारांशी उसाच्या दरासंदर्भात मोठा संघर्ष केला. मात्र, तरीही शेतकºयांच्या पदरात फारसे काही पडले नाही. अगोदर जाहीर केल्याप्रमाणे काही साखर कारखान्यांनी एका मस्टरचे पेमेंट काढले. मात्र, यावर्षी साखरेचा भाव हंगाम सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उतरला.४त्यामुळे साखर कारखानदारांनी पेमेंट देण्यात हात आखडला आहे. सुरुवातीला काही जणांनी २,३०० रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे पेमेंट दिले. मात्र, नंतरचे पेमेंट २,००० रुपयांप्रमाणे काढण्यात आले. त्यातही बहुतांश साखर कारखान्यांनी १५ डिसेंबरनंतरचे उसाचे बिल थकविल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.