शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

साडेतीन हजारपैकी २०० हेक्टरवर ऊस

By admin | Updated: May 10, 2016 00:02 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास साडेतीन हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र होते़ परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे हे क्षेत्र अवघ्या २०० हेक्टरवर आले आहे़ परिणामी,

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास साडेतीन हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र होते़ परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे हे क्षेत्र अवघ्या २०० हेक्टरवर आले आहे़ परिणामी, ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्याची स्थिती वाळवंटासारखी झाली आहे़ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव यासारखे मोठे प्रकल्प यंदा कोरडेठाक पडले आहेत़ परिणामी, भूजल पातळी सहा मीटरने खालावली आहे. तालुक्यातील ३४ हजार ५०० हेक्टर्स जमिनीपैकी जवळपास २० हजार हेक्टर्स जमीन काळी कसदार असून, घरणी आणि मांजरासारख्या मोठ्या नद्यांचा प्रत्येकी १२ कि.मी. चा किनारा लाभला आहे. तालुक्याच्या चार बाजूस चार प्रकल्प झाल्याने तालुक्यात सिंचन क्षेत्रास मोठा वाव मिळाला आणि साडेतीन हजार हेक्टर्समध्ये उसाची लागवड झाली होती़ यंदा सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. एकंदर, दुष्काळी परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने साडेतीन हजार हेक्टर्समधील उसाचे क्षेत्र शेतकऱ्यांना नाविलाजाने मोडीत काढावे लागले़(वार्ताहर)वैरणीसाठी वापर... सर्वाधिक उस उत्पादक शेतकरी अंगण गुणाले, धोंडिराम कारभारी, विठ्ठल पाटील म्हणाले, पशुधन जगविण्यासाठी उसाचा वैरण म्हणून गेली तीन महिन्यांपासून वापर सुरू आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. आता केवळ २०० हेक्टर्स ऊस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ग्रीन बेल्ट नाहिसा झाल्याचे तालुका कृषी अधिकारी डी.बी. सुतार, बिभीषण काळदाते, शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.