शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
2
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
3
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
5
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
6
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
8
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
9
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
11
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
12
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
13
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
14
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
15
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
16
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
17
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
18
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
19
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
20
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा

बागला ग्रुपची यशोगाथा : मेहनत, सचोटीने नावारूपास आलेले ‘उद्योग तपस्वी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:21 IST

पाच लाख रुपयात सुरू झालेला व्यवसाय ३० वर्षात ९०० कोटीवर पोहोचला आहे.

ठळक मुद्दे जन्मभूमी कोलकाता; कर्मभूमी बनवली औरंगाबाद १२ कंपन्यांची यशस्वी निर्मिती

औरंगाबाद : कोलकाता येथील ज्यूट मिल बंद पडल्यानंतर औरंगाबादचा रस्ता पकडलेल्या राजनारायण बागला यांनी पाच लाख रुपये गुंतवणूक करत औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीची  १० आक्टोबर १९८६ साली स्थापना केली. तेव्हापासून सुरू झालेला उद्योग प्रवास ९०० कोटींवर पोहोचला. यात ऋषी बागला यांची मेहनत,  सचोटी आणि तपश्चर्या आहे.

ऋषि बागला यांचे वडील पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी. कुटुंबाचा ज्यूट मिलचा व्यवसाय होता. हा व्यवसाय बंद पडला. कुटुंब विभक्त झाले. तेव्हा राजनारायण बागला यांनी औरंगाबादेत येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ते औरंगाबादेत दाखल झाले. तेव्हा औरंगाबादेत  बजाज ऑटो कंपनीच्या उद्योग उभारणीस सुरुवात झाली. याच कंपनीच्या दुचाकी वाहनांसाठी अ‍ॅल्युमिलियम डायकास्टचे (मॅग्नटो) उत्पादन सुरू केले. यासाठी त्यांनी औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. ची स्थापना केला. १९८९ साली ऋषी बागला हे कोलकाता येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी संपादन करून औरंगाबादेत दाखल झाले. त्यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांनी कंपनीची सहव्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळली.१९९० साली व्हिडीओकॉन कंपनीच्या वॉशिंग मशीनसाठी शाफ्टचे उत्पादन सुरु केले. १९९३ साली औरंगाबाद मोटर्सची स्थापना करून केनस्टारसाठी छोट्या आकाराच्या कुलरची निर्मिती सुरू केली. २००० साली तैवानच्या लीन ईलक्ट्रिकल्स कंपनीशी करार करून रिले बनवणे सुरू केले. अशा पद्धतीने बागला ग्रुपमध्ये १२ कंपन्यांची उभारणी केली. २००९ साली राजनारायण बागला यांचे निधन झाले. हा ऋषी बागला यांच्यासाठी मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरत त्यांनी उद्योगविस्तार सुरूच ठेवला. पाच लाख रुपयात सुरू झालेला व्यवसाय ३० वर्षात ९०० कोटीवर पोहोचला आहे. औरंगाबाद शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या कलासागर संस्थेच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रात भूमिका बजावणाऱ्या या उद्योगपतीला महाराष्ट्र शासनाने  ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरविले आहे.

चांगला निर्णयऋषी बागला यांच्याकडे भविष्यात या व्यवसायाचा व्याप सांभाळण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे. महिंद्रा ‘सीआयए’ला या उद्योगात रस असल्यामुळे त्यांनी हा प्लॅन विकत घेतला. ते या प्रकल्पात आणखी गुंतवणूक करतील. हा बागला आणि महिंद्रा या दोघांसाठीही चांगला निर्णय आहे.- राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए

औरंगाबादसाठी चांगली बातमी महिंद्रा ‘सीआयए’ने औरंगाबाद इलेक्ट्रिकल कंपनी विकत घेतली, ही औरंगाबादसाठी चांगली बातमी आहे. ‘महिंद्रा’चा हा निर्णय चांगला राहील.- राहुल धूत, व्यवस्थापकीय संचालक, धूत ट्रान्समिशन प्रा. लि.

टॅग्स :businessव्यवसायAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा