शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बागला ग्रुपची यशोगाथा : मेहनत, सचोटीने नावारूपास आलेले ‘उद्योग तपस्वी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:21 IST

पाच लाख रुपयात सुरू झालेला व्यवसाय ३० वर्षात ९०० कोटीवर पोहोचला आहे.

ठळक मुद्दे जन्मभूमी कोलकाता; कर्मभूमी बनवली औरंगाबाद १२ कंपन्यांची यशस्वी निर्मिती

औरंगाबाद : कोलकाता येथील ज्यूट मिल बंद पडल्यानंतर औरंगाबादचा रस्ता पकडलेल्या राजनारायण बागला यांनी पाच लाख रुपये गुंतवणूक करत औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीची  १० आक्टोबर १९८६ साली स्थापना केली. तेव्हापासून सुरू झालेला उद्योग प्रवास ९०० कोटींवर पोहोचला. यात ऋषी बागला यांची मेहनत,  सचोटी आणि तपश्चर्या आहे.

ऋषि बागला यांचे वडील पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी. कुटुंबाचा ज्यूट मिलचा व्यवसाय होता. हा व्यवसाय बंद पडला. कुटुंब विभक्त झाले. तेव्हा राजनारायण बागला यांनी औरंगाबादेत येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ते औरंगाबादेत दाखल झाले. तेव्हा औरंगाबादेत  बजाज ऑटो कंपनीच्या उद्योग उभारणीस सुरुवात झाली. याच कंपनीच्या दुचाकी वाहनांसाठी अ‍ॅल्युमिलियम डायकास्टचे (मॅग्नटो) उत्पादन सुरू केले. यासाठी त्यांनी औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. ची स्थापना केला. १९८९ साली ऋषी बागला हे कोलकाता येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी संपादन करून औरंगाबादेत दाखल झाले. त्यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांनी कंपनीची सहव्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळली.१९९० साली व्हिडीओकॉन कंपनीच्या वॉशिंग मशीनसाठी शाफ्टचे उत्पादन सुरु केले. १९९३ साली औरंगाबाद मोटर्सची स्थापना करून केनस्टारसाठी छोट्या आकाराच्या कुलरची निर्मिती सुरू केली. २००० साली तैवानच्या लीन ईलक्ट्रिकल्स कंपनीशी करार करून रिले बनवणे सुरू केले. अशा पद्धतीने बागला ग्रुपमध्ये १२ कंपन्यांची उभारणी केली. २००९ साली राजनारायण बागला यांचे निधन झाले. हा ऋषी बागला यांच्यासाठी मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरत त्यांनी उद्योगविस्तार सुरूच ठेवला. पाच लाख रुपयात सुरू झालेला व्यवसाय ३० वर्षात ९०० कोटीवर पोहोचला आहे. औरंगाबाद शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या कलासागर संस्थेच्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रात भूमिका बजावणाऱ्या या उद्योगपतीला महाराष्ट्र शासनाने  ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरविले आहे.

चांगला निर्णयऋषी बागला यांच्याकडे भविष्यात या व्यवसायाचा व्याप सांभाळण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे. महिंद्रा ‘सीआयए’ला या उद्योगात रस असल्यामुळे त्यांनी हा प्लॅन विकत घेतला. ते या प्रकल्पात आणखी गुंतवणूक करतील. हा बागला आणि महिंद्रा या दोघांसाठीही चांगला निर्णय आहे.- राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए

औरंगाबादसाठी चांगली बातमी महिंद्रा ‘सीआयए’ने औरंगाबाद इलेक्ट्रिकल कंपनी विकत घेतली, ही औरंगाबादसाठी चांगली बातमी आहे. ‘महिंद्रा’चा हा निर्णय चांगला राहील.- राहुल धूत, व्यवस्थापकीय संचालक, धूत ट्रान्समिशन प्रा. लि.

टॅग्स :businessव्यवसायAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा