शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

विभागीय पथकाचा अहवाल सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:27 IST

लातूर : समाजकल्याण विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती

लातूर : समाजकल्याण विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. या प्रकरणाची विभागीय पथकामार्फत चौकशी करण्यात आली असून, त्याचा अहवाल उपायुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्तांनी जिल्हा सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, ज्यांच्यावर हलगर्जीपणा केल्याच्या ठपका आहे, त्यांनी राज्याच्या आयुक्तांकडे आपली बाजू मांडल्याचे समजते.विस्तारीत एमआयडीसी भागात असलेल्या समाजकल्याण विभागाच्या एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ३४९ विद्यार्थ्यांना ३ डिसेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती. या प्रकरणी भोजन पुरवठा करणाऱ्या तेजल ट्रेडर्सचा ठेका तडकाफडकी रद्द करून संतोष ट्रेडर्सला देण्यात आला होता. मात्र वसतिगृहातील शासकीय कर्मचाऱ्यांनी भोजनाची चव घेतली होती का नाही, दररोज नोंदवहीत त्याची नोंद केली जाते का, विषबाधा झाली त्यादिवशी कोणाची सेवा होती. भोजन ठेका असणाऱ्या संस्थेच्या कामकाजाची दैनंदिन तपासणी केली जाते की नाही, याची तपासणी करण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या उपायुक्तांनी विभागीय चौकशी पथक नेमले होते. या पथकाने चौकशीचा अहवाल बुधवारी उपायुक्तांकडे सादर केला आहे. उपायुक्त लक्ष्मण वाघमारे यांनी या अहवालाच्या अनुषंगाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा सहाय्यक आयुक्त बी. जी. अरावत यांना दिले आहेत. शिवाय, या चौकशीचा अहवाल राज्याच्या आयुक्तांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती विभागीय उपायुक्त वाघमारे यांनी दिली.दरम्यान, चौकशी अहवालात एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील युनिट १, २, ३ आणि ४ क्रमांकाच्या अधीक्षकांवर ठपका ठेवण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे चारही वसतिगृह अधीक्षकांनी पुणे येथे ११ जानेवरी रोजी आयुक्तांकडे आपली बाजी मांडली आहे. भोजन पुरवठ्याच्या अनियमितेबाबत संबंधित ठेकेदारास दंड केल्याचे आयुक्तांना सांगितले आहे. त्यामुळे कारवाई काय होणार आणि कोणावर होणार याकडे लक्ष लागले आहे.