शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

विद्यार्थ्यांना मिळणार तीन दिवस दूध, अंडी, फळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:59 IST

औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी ४ हजार २८ गावांमध्ये प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.

ठळक मुद्देशाळा : दुष्काळामध्ये मध्यान्ह भोजन योजनेत सुधारणा

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी ४ हजार २८ गावांमध्ये प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.जिल्ह्यात सध्या उन्हाळी सुट्टीत जवळपास २०० जि. प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना लगेच आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी व फळे देण्यासंबंधी कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानंतरही १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडे, फळे देण्याची ही योजना कायम सुरू ठेवली जाणार आहे. जि. प. शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी वर्गात शिकणाऱ्या दुष्काळी अथवा टंचाईसदृश भागातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षभर शालेय पोषण आहारात योजनेंतर्गत तीन दिवस पूरक आहार देण्यासाठी आठवड्याला प्रतिविद्यार्थी १५ रुपये निधी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.दरम्यान, या योजनेचे स्वागत शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, राजेश भुसारी, शरद शहापूरकर, विनोद पवार, मच्छिंद्र भराडे, किशोर कदम, मीरा जाधव, शगुफ्ता फारुकी, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, ऊर्मिला राजपूत आदींनी केले आहे. पूरक आहारासाठी झालेला खर्च मुख्याध्यापकांना, बचत गटांना किंवा संबंधित यंत्रणेला अग्रीम स्वरूपात नियमितपणे देण्यात यावा, अशी मागणीही या संघटनेने केली आहे.------------

 

टॅग्स :Aurangabad Educational Officerऔरंगाबाद शिक्षणाधिकारीSchoolशाळा