शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार तीन दिवस दूध, अंडी, फळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:59 IST

औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी ४ हजार २८ गावांमध्ये प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.

ठळक मुद्देशाळा : दुष्काळामध्ये मध्यान्ह भोजन योजनेत सुधारणा

औरंगाबाद : औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्ह्यांतील घोषित करण्यात आलेल्या दुष्काळी ४ हजार २८ गावांमध्ये प्राथमिक शाळांत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत सुरू असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी, फळे देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केले आहेत.जिल्ह्यात सध्या उन्हाळी सुट्टीत जवळपास २०० जि. प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना लगेच आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडी व फळे देण्यासंबंधी कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानंतरही १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल. शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना आठवड्यातील तीन दिवस दूध, अंडे, फळे देण्याची ही योजना कायम सुरू ठेवली जाणार आहे. जि. प. शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी वर्गात शिकणाऱ्या दुष्काळी अथवा टंचाईसदृश भागातील विद्यार्थ्यांना पुढील वर्षभर शालेय पोषण आहारात योजनेंतर्गत तीन दिवस पूरक आहार देण्यासाठी आठवड्याला प्रतिविद्यार्थी १५ रुपये निधी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.दरम्यान, या योजनेचे स्वागत शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, संतोष ताठे, महेंद्र बारवाल, राजेश भुसारी, शरद शहापूरकर, विनोद पवार, मच्छिंद्र भराडे, किशोर कदम, मीरा जाधव, शगुफ्ता फारुकी, सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, ऊर्मिला राजपूत आदींनी केले आहे. पूरक आहारासाठी झालेला खर्च मुख्याध्यापकांना, बचत गटांना किंवा संबंधित यंत्रणेला अग्रीम स्वरूपात नियमितपणे देण्यात यावा, अशी मागणीही या संघटनेने केली आहे.------------

 

टॅग्स :Aurangabad Educational Officerऔरंगाबाद शिक्षणाधिकारीSchoolशाळा