शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

‘आरटीई’तून विद्यार्थ्याचा नंबर लागला; मात्र यादीतील शाळा झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:15 IST

विद्यार्थ्याचा नंबर लागला; पण ती शाळाच गायब आहे. पालकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला; पण ती शाळा कुठेही दिसून आली नाही.

ठळक मुद्दे प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण नंदनवन कॉलनीमध्ये शाळेचा शोध घेतला; पण ती कुठेही दिसून आली नाही.

औरंगाबाद : शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘आरटीई’ कायद्यांतर्गत २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाचे अनेक किस्से समोर येत आहेत. विद्यार्थ्याचा नंबर लागला; पण शाळेने तपासणी केली तेव्हा पालकाची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे निष्पन्न झाले. आता विद्यार्थ्याचा नंबर लागला; पण ती शाळाच गायब आहे. पालकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला; पण ती शाळा कुठेही दिसून आली नाही.

शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी वंचित व दुर्बल घटकांची व्याप्ती वाढविली आहे. वंचित घटकांमध्ये अनुसूचित जाती, जमातीसोबत भटके, विमुक्त, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्ग प्रवर्गाचा तर दुर्बल घटकांमध्ये एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी नव्याने प्रवेश नोंदणी राबविल्यानंतर ११ जून रोजी प्रवेश फेरी राबविण्यात आली.

यामध्ये भीमनगर- भावसिंगपुरा येथील पालकाने आपल्या पाल्यासाठी नंदनवन कॉलनी येथील शाळेला प्रवेशासाठी प्राधान्य दिले होते. या शाळेसह त्यांनी अन्य दहा ते बारा शाळांनाही पसंतीक्रम दर्शविलेला होता; पण योगायोगाने नंदनवन कॉलनीमधील लिटिल बर्ड या इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये त्यांचा नंबर लागला. त्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण नंदनवन कॉलनीमध्ये शाळेचा शोध घेतला; पण ती कुठेही दिसून आली नाही. दुसऱ्या यादीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याची आज १५ जूनची अखेरची मुदत आहे.

सकारात्मक निर्णय घेऊयासंदर्भात शिक्षणाधिकारी एस. जी. जैस्वाल म्हणाले की, ही चूक महापालिकेची आहे. शाळा अस्तित्वात आहेत की नाहीत, याची पडताळणी करणे व नसतील, तर त्या पोर्टलवरून काढून टाकण्याची जबाबदारी महापालिका शिक्षण विभागाची आहे. याप्रकरणी पालकाची तक्रार आलेली आहे.सदरील विद्यार्थ्यास दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्याची तरतूद केली जाईल.