शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘आरटीई’तून विद्यार्थ्याचा नंबर लागला; मात्र यादीतील शाळा झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:15 IST

विद्यार्थ्याचा नंबर लागला; पण ती शाळाच गायब आहे. पालकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला; पण ती शाळा कुठेही दिसून आली नाही.

ठळक मुद्दे प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण नंदनवन कॉलनीमध्ये शाळेचा शोध घेतला; पण ती कुठेही दिसून आली नाही.

औरंगाबाद : शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘आरटीई’ कायद्यांतर्गत २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाचे अनेक किस्से समोर येत आहेत. विद्यार्थ्याचा नंबर लागला; पण शाळेने तपासणी केली तेव्हा पालकाची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे निष्पन्न झाले. आता विद्यार्थ्याचा नंबर लागला; पण ती शाळाच गायब आहे. पालकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला; पण ती शाळा कुठेही दिसून आली नाही.

शिक्षण विभागाने न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी वंचित व दुर्बल घटकांची व्याप्ती वाढविली आहे. वंचित घटकांमध्ये अनुसूचित जाती, जमातीसोबत भटके, विमुक्त, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्ग प्रवर्गाचा तर दुर्बल घटकांमध्ये एचआयव्हीबाधित विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यासाठी नव्याने प्रवेश नोंदणी राबविल्यानंतर ११ जून रोजी प्रवेश फेरी राबविण्यात आली.

यामध्ये भीमनगर- भावसिंगपुरा येथील पालकाने आपल्या पाल्यासाठी नंदनवन कॉलनी येथील शाळेला प्रवेशासाठी प्राधान्य दिले होते. या शाळेसह त्यांनी अन्य दहा ते बारा शाळांनाही पसंतीक्रम दर्शविलेला होता; पण योगायोगाने नंदनवन कॉलनीमधील लिटिल बर्ड या इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये त्यांचा नंबर लागला. त्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण नंदनवन कॉलनीमध्ये शाळेचा शोध घेतला; पण ती कुठेही दिसून आली नाही. दुसऱ्या यादीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्याची आज १५ जूनची अखेरची मुदत आहे.

सकारात्मक निर्णय घेऊयासंदर्भात शिक्षणाधिकारी एस. जी. जैस्वाल म्हणाले की, ही चूक महापालिकेची आहे. शाळा अस्तित्वात आहेत की नाहीत, याची पडताळणी करणे व नसतील, तर त्या पोर्टलवरून काढून टाकण्याची जबाबदारी महापालिका शिक्षण विभागाची आहे. याप्रकरणी पालकाची तक्रार आलेली आहे.सदरील विद्यार्थ्यास दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्याची तरतूद केली जाईल.