शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणाचे धडे!

By admin | Updated: May 25, 2014 01:31 IST

औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा अधिक भर असायचा. आज विद्यार्थ्यांवर नुसते संस्कार करून उपयोग नाही

औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा अधिक भर असायचा. आज विद्यार्थ्यांवर नुसते संस्कार करून उपयोग नाही, तर त्यांना किमान कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञानही अवगत झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग शालेय अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करीत आहे. इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणही देण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावे यासाठी शिक्षण विभागातर्फे वारंवार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. या बदलामुळे अवघ्या सात-आठ वर्षे वयाच्या मुलांना शाळेत नवीन अभ्यासक्रमानुसार व्यावसायिक शिक्षणाचे धडे गिरविता येतील. पाठ्यपुस्तकातील मोठमोठे धडे वाचून प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आकलन क्षमता लक्षात घेऊन सहज लक्षात राहील अशा गोष्टींवर नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याची माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक चंद्रमणी बोरकर यांनी दिली. अभ्यासक्रमात करण्यात आलेले बदल मुलांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टिकोनातून योग्यच आहेत. सध्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनावर येणारे दडपण कमी होईल. शालेय जीवनातच त्यांचा पाया मजबूत झाल्यास ही पिढी भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षांना सहजपणे तोंड देऊ शकेल, असे मत पाठ्यपुस्तक मंडळाचे व्यवस्थापक भागवत पुरी यांनी व्यक्त केले.पुढील वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे २०१५-१६ मध्ये पाचवीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा अभ्यासक्रम बदलण्यात येणार होता, काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. भविष्यात चांगले आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी शालेय जीवनापासून तयार व्हावेत या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात आणखी नवीन प्रयोग अभ्यासक्रमात दिसून येतील यादृष्टीने शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.