शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणाचे धडे!

By admin | Updated: May 25, 2014 01:31 IST

औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा अधिक भर असायचा. आज विद्यार्थ्यांवर नुसते संस्कार करून उपयोग नाही

औरंगाबाद : काही वर्षांपूर्वी संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा अधिक भर असायचा. आज विद्यार्थ्यांवर नुसते संस्कार करून उपयोग नाही, तर त्यांना किमान कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञानही अवगत झाले पाहिजे, या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग शालेय अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करीत आहे. इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक शिक्षणही देण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावे यासाठी शिक्षण विभागातर्फे वारंवार अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. या बदलामुळे अवघ्या सात-आठ वर्षे वयाच्या मुलांना शाळेत नवीन अभ्यासक्रमानुसार व्यावसायिक शिक्षणाचे धडे गिरविता येतील. पाठ्यपुस्तकातील मोठमोठे धडे वाचून प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आकलन क्षमता लक्षात घेऊन सहज लक्षात राहील अशा गोष्टींवर नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याची माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक चंद्रमणी बोरकर यांनी दिली. अभ्यासक्रमात करण्यात आलेले बदल मुलांचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टिकोनातून योग्यच आहेत. सध्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते. या परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मनावर येणारे दडपण कमी होईल. शालेय जीवनातच त्यांचा पाया मजबूत झाल्यास ही पिढी भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षांना सहजपणे तोंड देऊ शकेल, असे मत पाठ्यपुस्तक मंडळाचे व्यवस्थापक भागवत पुरी यांनी व्यक्त केले.पुढील वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे २०१५-१६ मध्ये पाचवीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा अभ्यासक्रम बदलण्यात येणार होता, काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. भविष्यात चांगले आणि सर्वगुणसंपन्न विद्यार्थी शालेय जीवनापासून तयार व्हावेत या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. भविष्यात आणखी नवीन प्रयोग अभ्यासक्रमात दिसून येतील यादृष्टीने शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.