शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वशिलेबाजीत अडकले ‘बीजभांडवल’

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

औरंगाबाद : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या सुधारित बीजभांडवल योजनेच्या लाभार्थी निवडीच्या याद्या अखेर सोमवारी (दि.१६) जाहीर करण्यात आल्या

औरंगाबाद : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या सुधारित बीजभांडवल योजनेच्या लाभार्थी निवडीच्या याद्या अखेर सोमवारी (दि.१६) जाहीर करण्यात आल्या. लाभार्थ्यांची निवड करताना आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप बेरोजगारांनी केला आहे. पुढाऱ्यांच्या शिफारशींना लाभार्थी निवडीत झुकते माप दिल्याचा आरोपही काही जणांनी केला. यादीत आपले नाव नसल्याचे बघून काहींना रडू आवरणे कठीण झाले होते.बीजभांडवल योजनेंतर्गत स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी बेरोजगारांना २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य कर्जाच्या रुपात मिळवून दिले जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी बँकांना सादर केली जाते. या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातील ६७, तर मागास प्रवर्गातील १६७ लाभार्थ्यांची निवड करण्याचे उद्दिष्ट उद्योग केंद्राला देण्यात आले होते. खुल्या प्रवर्गातील १,५२५, तर मागास प्रवर्गातील १,३१३ जणांनी अर्ज केले होते. आपल्याच मर्जीतील लाभार्थ्यांची निवड करावी, यासाठी मंत्री, खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या होत्या. लाभार्थी निवडीसाठी मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली.अपेक्षाभंग झालाबीजभांडवल योजनेसाठी मी गेल्या चार वर्षांपासून अर्ज करीत आहे. मसाले, चिप्सच्या घरगुती उद्योगाच्या विस्तारासाठी यंदा अर्ज केला होता. मुलाखतही चांगली झाली होती. मुलाखतकर्त्यांनी तयार करण्यास सांगितलेले पदार्थ मी तातडीने केले होते. ‘तुमची निवड होईल,’ असा विश्वासही त्यांनी दिला होता; परंतु यादीत नाव नसल्याने अपेक्षाभंग झाला आहे. उद्योगासाठी कर्ज घेण्यास गेल्यास बँका तारण मागतात. तारण ठेवण्यासारखे काही नसल्याने बीजभांडवल योजनेसाठी अर्ज केला होता. गुणवत्तेच्या आधारावर निवडीची खात्री होती; परंतु यादीवर नजर टाकल्यानंतर लाभार्थी निवडीत नक्कीच घोटाळा झाल्याचे वाटते, असे मंजूषा कुलकर्णी यांनी सांगितले.अधिकाऱ्यांवर सरबत्तीयादी बघून संतप्त झालेल्या काही बेरोजगारांनी उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जी. बी. जोशी यांची भेट घेतली. आपली निवड न झाल्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करून त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. बेरोजगारांची समजूत घालण्याचा जोशी यांनी प्रयत्न केला.पारदर्शी निवडबीजभांडवल योजनेसाठी उद्दिष्टाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते.लाभार्थ्यांची निवड अत्यंत पारदर्शकपणे केली. राजकीय दबाव व आर्थिक कारणांमुळे निवड झाल्याच्या आरोपात कसलेही तथ्य नसल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जी. बी. जोशी यांनी सांगितले.