शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

वशिलेबाजीत अडकले ‘बीजभांडवल’

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

औरंगाबाद : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या सुधारित बीजभांडवल योजनेच्या लाभार्थी निवडीच्या याद्या अखेर सोमवारी (दि.१६) जाहीर करण्यात आल्या

औरंगाबाद : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या सुधारित बीजभांडवल योजनेच्या लाभार्थी निवडीच्या याद्या अखेर सोमवारी (दि.१६) जाहीर करण्यात आल्या. लाभार्थ्यांची निवड करताना आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप बेरोजगारांनी केला आहे. पुढाऱ्यांच्या शिफारशींना लाभार्थी निवडीत झुकते माप दिल्याचा आरोपही काही जणांनी केला. यादीत आपले नाव नसल्याचे बघून काहींना रडू आवरणे कठीण झाले होते.बीजभांडवल योजनेंतर्गत स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी बेरोजगारांना २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य कर्जाच्या रुपात मिळवून दिले जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी बँकांना सादर केली जाते. या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातील ६७, तर मागास प्रवर्गातील १६७ लाभार्थ्यांची निवड करण्याचे उद्दिष्ट उद्योग केंद्राला देण्यात आले होते. खुल्या प्रवर्गातील १,५२५, तर मागास प्रवर्गातील १,३१३ जणांनी अर्ज केले होते. आपल्याच मर्जीतील लाभार्थ्यांची निवड करावी, यासाठी मंत्री, खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या होत्या. लाभार्थी निवडीसाठी मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली.अपेक्षाभंग झालाबीजभांडवल योजनेसाठी मी गेल्या चार वर्षांपासून अर्ज करीत आहे. मसाले, चिप्सच्या घरगुती उद्योगाच्या विस्तारासाठी यंदा अर्ज केला होता. मुलाखतही चांगली झाली होती. मुलाखतकर्त्यांनी तयार करण्यास सांगितलेले पदार्थ मी तातडीने केले होते. ‘तुमची निवड होईल,’ असा विश्वासही त्यांनी दिला होता; परंतु यादीत नाव नसल्याने अपेक्षाभंग झाला आहे. उद्योगासाठी कर्ज घेण्यास गेल्यास बँका तारण मागतात. तारण ठेवण्यासारखे काही नसल्याने बीजभांडवल योजनेसाठी अर्ज केला होता. गुणवत्तेच्या आधारावर निवडीची खात्री होती; परंतु यादीवर नजर टाकल्यानंतर लाभार्थी निवडीत नक्कीच घोटाळा झाल्याचे वाटते, असे मंजूषा कुलकर्णी यांनी सांगितले.अधिकाऱ्यांवर सरबत्तीयादी बघून संतप्त झालेल्या काही बेरोजगारांनी उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जी. बी. जोशी यांची भेट घेतली. आपली निवड न झाल्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करून त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. बेरोजगारांची समजूत घालण्याचा जोशी यांनी प्रयत्न केला.पारदर्शी निवडबीजभांडवल योजनेसाठी उद्दिष्टाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते.लाभार्थ्यांची निवड अत्यंत पारदर्शकपणे केली. राजकीय दबाव व आर्थिक कारणांमुळे निवड झाल्याच्या आरोपात कसलेही तथ्य नसल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जी. बी. जोशी यांनी सांगितले.