शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी संघर्ष !

By admin | Updated: April 16, 2016 23:26 IST

नितीन कांबळे ल्ल कडा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थांची आजही हंडाभर पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

खिळद गावची परिस्थिती : दोन टँकरवर तीन हजार नागरिकांची भागतेय तहाननितीन कांबळे ल्ल कडामागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थांची आजही हंडाभर पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात केवळ दोनच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.खिळद गावची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात आहे. परंतु परिसरातील जलस्त्रोत आटल्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. भटकंती करूनही पाणी मिळत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. प्रशासनाकडे हात पसरल्यानंतर केवळ दोन टँकर देऊन बोळवण करण्यात आली. परंतु गावची लोकसंख्या पाहता टँकरची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.अनेक वेळा वेळेवर टँकर येत नसल्याने लहान मुलांना सोबत घेऊन महिला उजाडल्यापासूनच घराबाहेर पडत आहेत. ही परिस्थिती केवळ खिळद ग्रामस्थांची नसून, परिसरातील १० ते १५ खेड्यांमधील चित्र यापेक्षा वेगळे नाही.एप्रिल महिन्यातच खिळद गावात भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने येणारे दोन महिने काढायचे कसे असा प्रश्न आता ग्रामस्थांसमोर उभा आहे. पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी स्थलांतरही केले आहे. काहीजण शेतात राहण्यासाठी गेले आहेत. जनावरांचेही पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विकून टाकली आहेत.टँकरची संख्या वाढवासध्या सुरू असलेली टँकरची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. टँकरची संख्या वाढवून ग्रामस्थांचे हाल कमी करावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.लहान मुलांच्याही डोक्यावर दिसतो पाण्याचा हंडाआष्टी तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांची वणवण भटकंती सुरू आहे. सकाळी उजाडतच लहान मुलांपासून ते महिला, पुरूषांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा पाहवयास मिळतो. ही परिस्थिती संपूर्ण तालुक्यात दिसून येते.जनावरांचेही पिण्याच्या पाण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे बाजारात विक्रीसाठी दाखल केली आहेत. तसेच परिसरातील जलस्त्रोतही आटल्यामुळे पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न खिळद ग्रामस्थांसमोर उपस्थित राहिला आहे.