शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

हंडाभर पाण्यासाठी संघर्ष !

By admin | Updated: April 16, 2016 23:26 IST

नितीन कांबळे ल्ल कडा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थांची आजही हंडाभर पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

खिळद गावची परिस्थिती : दोन टँकरवर तीन हजार नागरिकांची भागतेय तहाननितीन कांबळे ल्ल कडामागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करीत आलेल्या आष्टी तालुक्यातील खिळद ग्रामस्थांची आजही हंडाभर पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात केवळ दोनच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.खिळद गावची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात आहे. परंतु परिसरातील जलस्त्रोत आटल्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागते. भटकंती करूनही पाणी मिळत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. प्रशासनाकडे हात पसरल्यानंतर केवळ दोन टँकर देऊन बोळवण करण्यात आली. परंतु गावची लोकसंख्या पाहता टँकरची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.अनेक वेळा वेळेवर टँकर येत नसल्याने लहान मुलांना सोबत घेऊन महिला उजाडल्यापासूनच घराबाहेर पडत आहेत. ही परिस्थिती केवळ खिळद ग्रामस्थांची नसून, परिसरातील १० ते १५ खेड्यांमधील चित्र यापेक्षा वेगळे नाही.एप्रिल महिन्यातच खिळद गावात भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने येणारे दोन महिने काढायचे कसे असा प्रश्न आता ग्रामस्थांसमोर उभा आहे. पाणी उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी स्थलांतरही केले आहे. काहीजण शेतात राहण्यासाठी गेले आहेत. जनावरांचेही पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत असल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विकून टाकली आहेत.टँकरची संख्या वाढवासध्या सुरू असलेली टँकरची संख्या खूपच अपुरी आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. टँकरची संख्या वाढवून ग्रामस्थांचे हाल कमी करावेत, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.लहान मुलांच्याही डोक्यावर दिसतो पाण्याचा हंडाआष्टी तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांची वणवण भटकंती सुरू आहे. सकाळी उजाडतच लहान मुलांपासून ते महिला, पुरूषांच्या डोक्यावर पाण्याचा हंडा पाहवयास मिळतो. ही परिस्थिती संपूर्ण तालुक्यात दिसून येते.जनावरांचेही पिण्याच्या पाण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरे बाजारात विक्रीसाठी दाखल केली आहेत. तसेच परिसरातील जलस्त्रोतही आटल्यामुळे पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न खिळद ग्रामस्थांसमोर उपस्थित राहिला आहे.