शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

किनवटमध्ये भाजपची अस्तित्वासाठी धडपड

By admin | Updated: June 29, 2017 00:28 IST

किनवट : किनवट तालुक्यावर राष्ट्रवादीचे आ़प्रदीप नाईक यांची मजबूत पकड आहे़ दुसरीकडे राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपा तसेच काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी केवीलवाणी धडपड करीत आहे़

गोकुळ भवरे । लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : किनवट तालुक्यावर राष्ट्रवादीचे आ़प्रदीप नाईक यांची मजबूत पकड आहे़ दुसरीकडे राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपा तसेच काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी केवीलवाणी धडपड करीत आहे़ माजी आ़ भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी महासंघाचे अस्तित्व बऱ्यापैकी आहे़एके काळी काँग्रेस पक्ष तालुक्यात सत्ताधारी होता़ सत्ता नसल्यामुळे सध्या या पक्षाला उतरती कळा लागली़ त्यात अंतर्गत गटबाजीही आली़ अंतर्गत गटबाजीने काँग्रेसला पुरते नामोहरण करून सोडले़ पक्षवाढीसाठी कोणीही झटत नाही़ काही नेते केवळ पांढरा ड्रेस घालून स्वत:ला मिरवितात़ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नावावर कसेबसा हा पक्ष तालुक्यात तग धरून आहे़ अशोकरावांनी लक्ष घातल्यास पुन्हा काँग्रेस तालुक्यात भरारी घेवू शकते, ही वस्तुस्थिती आहे. भाजपाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही़ माजीमंत्री डी़ बी़ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने तालुक्यात अनेक वर्षे बऱ्यापैकी कामगिरी केली होती़ डी़बी़ पाटील यांचे सध्याचे अस्तित्व नावालाच आहे़ केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असतानाही सत्तेचा लाभ भाजपा कार्यकर्त्यांना अद्यापही उठविता आला नाही़ भाजपालाही अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे़ डी़बी़ पाटील, सुधाकर भोयर, अशोक पाटील सूर्यवंशी यांचे अंतर्गत गट असल्याने या पक्षाला तालुक्यात विस्तारण्याची मोठी संधी असतानाही प्रभावी कामगिरी अद्यापही करता आली नाही़ भाजपा नेते अशोक सूर्यवंशी सर्वांची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत असताना पक्षातील इतर त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत़ दुसरीकडे आ़प्रदीप नाईक यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा बाजी मारली़ त्यांच्याकडे विकासाचा दृृष्टिकोन असल्याने मतदारांनी त्यांना विधानसभेत पाठविले़ तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात सुटल्या आहेत़ सध्यातरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच बॉस बनला आहे़ दरम्यान, तालुक्यात शिवसेनाही आहे़ मार्क्सवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष, एमआयएम आदी पक्षही आहेत.़ एखाददोघा पक्षाचा अपवाद सोडला तर सर्व कागदावरच आहे़ तालुक्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे़ तसा प्रयत्न होत नाही़ सर्व एकत्र आले तर जिल्ह्याचा प्रश्न किंवा तत्सम इतर कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही, यासाठी आ़ प्रदीप नाईक यांनीच पुढाकार घ्यावा, असे झाल्यास तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, हे नक्की.