शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

तांत्रिक अडचणीने विद्यार्थ्यांची ‘सत्त्व’ परीक्षा; त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठाने दिली तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:52 IST

पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही.

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षेत उडालेला तांत्रिक गोंधळ थांबणार आहे की नाही. तुमच्यामुळे विद्यापीठाची जनसामान्यांमध्ये बदनामी होत आहे. यापुढे तांत्रिक अडचणीची कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, या शब्दांत परीक्षा घेणाऱ्या त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठ प्रशासनाने चांगलेच खडसावले. तरीही शुक्रवारी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला; पण त्याचे प्रमाण कमी होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ९ ऑक्टोबरपासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांना पेपरची लिंक ओपन झाली नाही. लिंक ओपन झाली, तर दुसऱ्याच विषयाचा पेपर स्क्रीनवर यायचा. सकाळच्या सत्रात ६० प्रश्न, तर दुपारच्या सत्रात ३० प्रश्न, अनेक प्रश्न तसेच पर्यायी उत्तरे चुकीची, कधी कधी रात्री उशिरापर्यंत ऑफलाईन पेपर डाऊनलोड होत नसत. या सर्व प्रकारांमुळे परीक्षार्थी हतबल झाले आहेत. 

दरम्यान, विद्यापीठाने पहिल्यांदाच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन केले असून, ही परीक्षा त्रयस्थ यंत्रणेमार्फत घेतली जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने या यंत्रणेला शुक्रवारी चांगलीच तंबी दिली असून, यापुढे कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही पाहिजेत. गरज पडल्यास सर्व्हर हाताळण्यासाठी मनुष्यबळ वाढवा, अशा सूचनाही केल्या. त्यानुसार सदरील यंत्रणेने मनुष्यबळ वाढवून येणाऱ्या तांत्रिक अडचणीही सुधारण्याचा प्रयत्न केला. तरीही आज काही प्रमाणात लिंक उशिरा ओपन होणे, ऑफलाईन पेपर लवकर डाऊनलोड न होणे, अशा तक्रारी आल्या.

विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाहीयुवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, भारतीय विद्यार्थी सेनेचे डॉ. तुकाराम सराफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संकेत कांबळे, रोहित जोगदंड, कपिल वानखेडे, राहुल कांबळे आदींनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेतली. परीक्षेतील गोंधळ थांबवाविद्यापीठाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, याची दखल घ्यावी लागेल; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा दिला. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले म्हणाले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, याची मी खात्री देतो.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा