शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

तांत्रिक अडचणीने विद्यार्थ्यांची ‘सत्त्व’ परीक्षा; त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठाने दिली तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:52 IST

पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही.

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षेत उडालेला तांत्रिक गोंधळ थांबणार आहे की नाही. तुमच्यामुळे विद्यापीठाची जनसामान्यांमध्ये बदनामी होत आहे. यापुढे तांत्रिक अडचणीची कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, या शब्दांत परीक्षा घेणाऱ्या त्रयस्थ यंत्रणेला विद्यापीठ प्रशासनाने चांगलेच खडसावले. तरीही शुक्रवारी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला; पण त्याचे प्रमाण कमी होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ९ ऑक्टोबरपासून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतींच्या परीक्षांचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांना पेपरची लिंक ओपन झाली नाही. लिंक ओपन झाली, तर दुसऱ्याच विषयाचा पेपर स्क्रीनवर यायचा. सकाळच्या सत्रात ६० प्रश्न, तर दुपारच्या सत्रात ३० प्रश्न, अनेक प्रश्न तसेच पर्यायी उत्तरे चुकीची, कधी कधी रात्री उशिरापर्यंत ऑफलाईन पेपर डाऊनलोड होत नसत. या सर्व प्रकारांमुळे परीक्षार्थी हतबल झाले आहेत. 

दरम्यान, विद्यापीठाने पहिल्यांदाच ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन केले असून, ही परीक्षा त्रयस्थ यंत्रणेमार्फत घेतली जात आहे. विद्यापीठ प्रशासनाने या यंत्रणेला शुक्रवारी चांगलीच तंबी दिली असून, यापुढे कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाही पाहिजेत. गरज पडल्यास सर्व्हर हाताळण्यासाठी मनुष्यबळ वाढवा, अशा सूचनाही केल्या. त्यानुसार सदरील यंत्रणेने मनुष्यबळ वाढवून येणाऱ्या तांत्रिक अडचणीही सुधारण्याचा प्रयत्न केला. तरीही आज काही प्रमाणात लिंक उशिरा ओपन होणे, ऑफलाईन पेपर लवकर डाऊनलोड न होणे, अशा तक्रारी आल्या.

विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाहीयुवा सेनेचे उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, भारतीय विद्यार्थी सेनेचे डॉ. तुकाराम सराफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संकेत कांबळे, रोहित जोगदंड, कपिल वानखेडे, राहुल कांबळे आदींनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेतली. परीक्षेतील गोंधळ थांबवाविद्यापीठाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे, याची दखल घ्यावी लागेल; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा दिला. तेव्हा कुलगुरू डॉ. येवले म्हणाले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहाणार नाही. एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ देणार नाही, याची मी खात्री देतो.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादexamपरीक्षा