शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

महसूल वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:20 IST

यावर्षी मांजरा नदीच्या वाळू घाटात दुपटीने वाढ करण्यात आली असून रॉयल्टीच्या माध्यमातून महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी एका घाटावरचे दोन-दोन घाट करून ई-लिलाव पद्धतीने ठेका देण्यासाठी प्रक्रियेस प्रारंभ झाला़ दरम्यान, शासकीय वाळू घाट पाठोपाठ खाजगी शेतकºयांचे ३५ वाळू पट्ट्यांचे प्रस्ताव असून ज्यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गतवर्षी अर्धवट उपसा झालेल्या पंधरा वाळू पट्ट्यांचा समावेश आहे़ शासकीय १७ घाटांचा लिलाव होणार आहे़

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : यावर्षी मांजरा नदीच्या वाळू घाटात दुपटीने वाढ करण्यात आली असून रॉयल्टीच्या माध्यमातून महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी एका घाटावरचे दोन-दोन घाट करून ई-लिलाव पद्धतीने ठेका देण्यासाठी प्रक्रियेस प्रारंभ झाला़ दरम्यान, शासकीय वाळू घाट पाठोपाठ खाजगी शेतकºयांचे ३५ वाळू पट्ट्यांचे प्रस्ताव असून ज्यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गतवर्षी अर्धवट उपसा झालेल्या पंधरा वाळू पट्ट्यांचा समावेश आहे़ शासकीय १७ घाटांचा लिलाव होणार आहे़तेलंगणा-मराठवाड्याच्या सीमा भागातून वाहणारी मांजरा नदी लाल स्फटिक आकाराच्या वाळूसाठी तीन राज्यात प्रसिद्ध आहे़ तेलंगणा-महाराष्टÑ व कर्नाटक राज्यात या वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात आहे़ लगतच्या तेलंगणात वाळू उपशावर निर्बंध असल्याने मागच्या १२ वर्षांपासून मांजराच्या वाळूला महत्त्व व मागणी आहे़ बांधकामपाठोपाठ याच लाल वाळूचा वापर रासायनिक खत कारखान्यातही होत असतो़ परिणामी मांजराची वाळू दोन्ही कामासाठी उपयोगात घेतली जाते़ शासनाकडून ब्रास पद्धतीने वाळूचा लिलाव होत असला तरी बाजारात मात्र वजनावर वाळूची विक्री होते़ यावर्षी पावसाळ्यात प्रारंभी व परतीचा पाऊस मोठा झाल्याने मांजराच्या सर्व वाळू घाटात वाळूचा साठा जमा आहे़ महसूल, पर्यावरण, भूजल सर्वेक्षण, भूमी अभिलेख, महाराष्ट्र प्रदूषण विभाग, जिल्हा खनिकर्म अशा वेगवेगळ्या विभागाकडून आलेल्या अहवालानुसार प्रत्येक घाटावरचा वाळू साठा निश्चित करण्यात आला़अशा सर्व शासकीय वाळू घाटांतून शासनाला जवळपास ४० कोटींचा महसूल अपेक्षित आहे़ सर्व मांजराच्या पात्रातील गट नंबर निश्चित करण्यात आले असून वाळूसाठा देखील ठरवण्यात आला़ याच महिनाअखेर ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे़ शासकीय वाळू घाट पाठोपाठ खाजगी वाळू पट्ट्यांचे प्रस्ताव आलेले असून जवळपास ३५ शेतकºयांनी वाळू उपशाकरिता जिल्हाधिकाºयांकडे अर्ज केलेले आहेत़; पण गतवर्षी अर्धवट वाळू उपसा त्याचप्रमाणे शासनाकडून बंद करण्यात आलेल्या १५ पट्टेधारकांनी उच्च न्यायालयातून पुनश्च उपशाचे आदेश आणले आहेत़ शासकीय वाळू पट्ट्यांची संपूर्ण लिलाव प्रक्रिया संपल्यानंतरच खाजगी वाळू पट्ट्यांचा विचार केला जाणार अशी माहिती मिळाली़