शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

महसूल वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:20 IST

यावर्षी मांजरा नदीच्या वाळू घाटात दुपटीने वाढ करण्यात आली असून रॉयल्टीच्या माध्यमातून महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी एका घाटावरचे दोन-दोन घाट करून ई-लिलाव पद्धतीने ठेका देण्यासाठी प्रक्रियेस प्रारंभ झाला़ दरम्यान, शासकीय वाळू घाट पाठोपाठ खाजगी शेतकºयांचे ३५ वाळू पट्ट्यांचे प्रस्ताव असून ज्यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गतवर्षी अर्धवट उपसा झालेल्या पंधरा वाळू पट्ट्यांचा समावेश आहे़ शासकीय १७ घाटांचा लिलाव होणार आहे़

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : यावर्षी मांजरा नदीच्या वाळू घाटात दुपटीने वाढ करण्यात आली असून रॉयल्टीच्या माध्यमातून महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी एका घाटावरचे दोन-दोन घाट करून ई-लिलाव पद्धतीने ठेका देण्यासाठी प्रक्रियेस प्रारंभ झाला़ दरम्यान, शासकीय वाळू घाट पाठोपाठ खाजगी शेतकºयांचे ३५ वाळू पट्ट्यांचे प्रस्ताव असून ज्यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गतवर्षी अर्धवट उपसा झालेल्या पंधरा वाळू पट्ट्यांचा समावेश आहे़ शासकीय १७ घाटांचा लिलाव होणार आहे़तेलंगणा-मराठवाड्याच्या सीमा भागातून वाहणारी मांजरा नदी लाल स्फटिक आकाराच्या वाळूसाठी तीन राज्यात प्रसिद्ध आहे़ तेलंगणा-महाराष्टÑ व कर्नाटक राज्यात या वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात आहे़ लगतच्या तेलंगणात वाळू उपशावर निर्बंध असल्याने मागच्या १२ वर्षांपासून मांजराच्या वाळूला महत्त्व व मागणी आहे़ बांधकामपाठोपाठ याच लाल वाळूचा वापर रासायनिक खत कारखान्यातही होत असतो़ परिणामी मांजराची वाळू दोन्ही कामासाठी उपयोगात घेतली जाते़ शासनाकडून ब्रास पद्धतीने वाळूचा लिलाव होत असला तरी बाजारात मात्र वजनावर वाळूची विक्री होते़ यावर्षी पावसाळ्यात प्रारंभी व परतीचा पाऊस मोठा झाल्याने मांजराच्या सर्व वाळू घाटात वाळूचा साठा जमा आहे़ महसूल, पर्यावरण, भूजल सर्वेक्षण, भूमी अभिलेख, महाराष्ट्र प्रदूषण विभाग, जिल्हा खनिकर्म अशा वेगवेगळ्या विभागाकडून आलेल्या अहवालानुसार प्रत्येक घाटावरचा वाळू साठा निश्चित करण्यात आला़अशा सर्व शासकीय वाळू घाटांतून शासनाला जवळपास ४० कोटींचा महसूल अपेक्षित आहे़ सर्व मांजराच्या पात्रातील गट नंबर निश्चित करण्यात आले असून वाळूसाठा देखील ठरवण्यात आला़ याच महिनाअखेर ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे़ शासकीय वाळू घाट पाठोपाठ खाजगी वाळू पट्ट्यांचे प्रस्ताव आलेले असून जवळपास ३५ शेतकºयांनी वाळू उपशाकरिता जिल्हाधिकाºयांकडे अर्ज केलेले आहेत़; पण गतवर्षी अर्धवट वाळू उपसा त्याचप्रमाणे शासनाकडून बंद करण्यात आलेल्या १५ पट्टेधारकांनी उच्च न्यायालयातून पुनश्च उपशाचे आदेश आणले आहेत़ शासकीय वाळू पट्ट्यांची संपूर्ण लिलाव प्रक्रिया संपल्यानंतरच खाजगी वाळू पट्ट्यांचा विचार केला जाणार अशी माहिती मिळाली़