शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रणालीच्या आत्महत्येस कारणीभूत आरोपीला कठोर शिक्षा द्या; उंदणगावात मूकमोर्चाद्वारे नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 16:32 IST

शंभर टक्के गाव बंद ठेऊन सर्वच जण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. 

उंडणगाव (औरंगाबाद ) : प्रणाली जाधव अमर रहे ,लिपिक नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, शालेय मुलींना सुरक्षित शिक्षण मिळावे. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी. तसेच या प्रकरणाचा तपास प्रसिद्ध विधितज्ञ उज्ज्वल निकम यांच्या कडे देण्यात यावा आदी मागण्यांसाठी येथे मुक मोर्चा काढण्यात आला होता. सदरील मागण्याचे निवेदन पोलीस व महसूल प्रशासनाला देण्यात आले. या मुक मोर्चात शालेय विद्यार्थी सह संपूर्ण गाव सहभागी झाले होते. तर शंभर टक्के गाव बंद ठेऊन सर्वच जण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. 

उंडणगावमध्ये  महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्रणाली कृष्णा जाधव हीने ५ फेब्रुवारी रोजी एका लिपिकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेचा पडतास राज्यभर उमटत आहेत . येथे महा मोर्चाचे शनिवार रोजी सकाळी करण्यात आले होते. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयापासून मुक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात शालेय विद्यार्थी, विधार्थीनी, महिला, तरूण, तरूणी, गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  

गावातील बाजारपेठ भागातील श्री. मारोती मंदिरासमोर शालेय विद्यार्थ्यांनी यांनी आपल्या भाषणातून विविध समस्या व मुलांपासून होणाऱ्या त्रास हे सांगितले. तसेच या शालेय विद्यार्थीनीच्या हस्ते अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, नायब तहसीलदार सोनवणे, तलाठी कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.