शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

कठोर निर्बंध केवळ नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:05 IST

--- रिॲलिटी चेक : मास्क हनुवटीवर, कार्यालये, रुग्णालय परिसरात रंगताहेत गप्पांचे फड औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ ...

---

रिॲलिटी चेक : मास्क हनुवटीवर, कार्यालये, रुग्णालय परिसरात रंगताहेत गप्पांचे फड

औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: लाॅकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवार पूर्ण दिवस लाॅकडाऊन जाहीर केले असून, कोरोनाबाबत कठोर निर्बंध घातले आहेत. मात्र, नागरिकांकडून हलगर्जीपणा केला जात आहे. पोलीस किंवा मनपाची पथके दिसल्यावर अथवा कोणी हटकले, तरच हनुवटीवरचा मास्क वर चढवला जातो. नागरिकांकडून निर्बंधाचे गांभीर्याने पालन केले जात नसल्याचे रिॲलिटी चेकमधून दिसून आले.

अलिकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर औरंगपुरा, गुलमंडीसह मध्यवर्ती शहरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या हनुवटीवर मास्क लावल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे. पैठणगेट परिसरात अनेक दुकानदारही मास्क न लावता ग्राहकांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. गर्दीवर निर्बंध असताना मुख्य बाजारपेठांतील गर्दी अद्याप ओसरलेली नाही. बुधवारपासून हाॅटेल, रेस्टाॅरंटमधील डायनिंग सुविधा बंद करण्यात आली आहे. मोठी हाॅटेल्स, रेस्टाॅरंटमध्ये केवळ पार्सल सुविधा सुरु राहील, असे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, निराला बाजार परिसरात अनेक अल्पोपाहार हॉटेल्स सुरु असल्याचे बुधवारी दुपारच्या वेळी दिसून आले.

---

संयुक्त पाहणी, दंडात्मक कारवाईची ताकीद

---

कोरोनाच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त यांनी संयुक्त पाहणी केली. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, व्यापारी व दुकानदारांवर दोन ते पाच हजार दंडाची कारवाई करुन नियम न पाळल्यास परवाना रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील विविध भागांत जनजागृतीसाठी सात पथके तैनात करण्यात आली असून, विनामास्क रिक्षाचालक व नागरिकांना मोफत मास्क वाटप करण्यात येत आहे. तसेच नागरी मित्र आणि पोिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

----

कोठे काय आढळले

---

चित्रपटगृहे

--

औरंगपुऱ्यातील चित्रपटगृहाचे सकाळच्या सत्राचे चार शो प्रेक्षकांअभावी रद्द करण्यात आल्याचे तेथील व्यवस्थापकांनी सांगितले, तर दुपारी पाच वाजेदरम्यान शेवटचा शो असतो. दुपारी २० हून अधिक प्रेक्षक आले होते. चित्रपटगृहात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन केले जात होते. मात्र, आता उपस्थितीच पाच टक्केही नसल्याचे व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.

---

विवाह समारंभ

---

५ एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांत विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आलेली नाही, तर इतर कार्यक्रमही होत नसल्याने सभागृह, मंगल कार्यालये बंदच असल्याचे दिसून आले. अशंत: लाॅकडाऊनच्या काळातील काही बुकिंग होते. त्याऐवजी संयोजकांकडून पुढच्या तारखांचे नियोजन होत असल्याचे पदमपुरा येथील मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी सांगितले.

---

अंत्यविधी

---

बुधवारी दुपारी नॅशनल काॅलनी येथील बाधित वृद्धेवर पु्प्षनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यविधी करणाऱ्या पथकासह अवघे पाच ते सात नातेवाईक स्मशानभूमीत उपस्थित होते. नातेवाईकांना विनंती केली, तर ते एकतात. अंत्यविधीच्या वेळी गर्दी करत नाहीत. मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जातो, असे गोविंग गायकवाड म्हणाले.

---

कार्यालये

---

जिल्हा परिषद, घाटी रुग्णालय, जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालयात कर्मचारी मास्क, सॅनिटाझरचा वापर करुन काम करताना दिसले. मात्र, अभ्यागत, रुग्णांच्या नातेवाईकांकडून मास्क वापराला फाटा दिला जात आहे. अनेकांचे मास्क हनुवटीवर असतात. सुरक्षारक्षक, कर्मचारी त्यांना ओरडून मास्क वर करायला घाटीत सांगत होते. त्यालाही अनेकजण जुमानत नव्हते.

---

गृह विलगीकरण

--

रुग्णालयात जागाच नसल्याने अनेकांना गृहविलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. त्यात कुटुंबियांकडूनही काळजी घेतली जात आहे. मात्र, स्नेहनगर, खडकेश्वर, श्रेयनगर परिसरात विलगीकरण झालेल्या घरांंच्या दारावर कुठलाही बोर्ड दिसून आला नाही. मनपाकडून निर्जंतुकीकरण केल्याचे नातेवाईक म्हणाले.

--