शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
3
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
4
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
5
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
6
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
7
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
8
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
9
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
10
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
11
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
12
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
13
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
14
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
15
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
16
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
17
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:17 IST

ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरणांतून जायकवाडी धरणात तात्काळ पाणी सोडावे आणि मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी परभणीतील शेतकºयांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्दे वरच्या धरणांतून पाणी सोडा : पाणी कपातीचा निर्णय रद्द करा, परभणी जिल्ह्याला आवर्तने सोडण्याची मागणी

औरंगाबाद : ऊर्ध्व गोदावरी खोºयातील धरणांतून जायकवाडी धरणात तात्काळ पाणी सोडावे आणि मराठवाड्याच्या सिंचनाचे पाणी कपात करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी परभणीतील शेतकºयांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.अखिल भारतीय किसान सभा परभणी जिल्हा कमिटीतर्फे हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी विलास बाबर, लिंबाजी कचरे, लक्ष्मीकांत साकुडकर, दीपक लिपणे, गोपाळ कुलकर्णी, रामकिशन खवळे, अनंतराव कच्छवे, अंकुश तवर, सुदामराव आंधळे, मुंजाजी काळे, रामप्रसाद कदम यांच्यासह तीस ते चाळीस शेतकरी आणि कामगारांंची उपस्थिती होती.२०१४ पासून परभणी जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळात होरपून निघत आहे. जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला सिंचनासाठी मिळणाºया ४२० दलघमी पाण्याची कपात करून शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. १२ सप्टेंबर रोजी पाणी वाटपाचे फेरनियोजन करून शेतकºयांच्या सिंचनाचे पाणी कपात करून बीअर कंपन्यांच्या घशात पाणी घालण्याचा डाव आखल्याचा संताप यावेळी शेतकºयांनी व्यक्त केला. हा निर्णय रद्द करून परभणी जिल्ह्याला रबीसाठी चार पाणी पाळ्या आणि उन्हाळ्यात जनावरांच्या चाºयासाठी, पिण्यासाठी दोन आवर्तने सोडण्याची आग्रही मागणी शेतकºयांनी केली.जवळपास दोन तास शेतकºयांनी ठिय्या आंदोलन केले. सत्यता पडताळल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शेतकºयांना देण्यात आले.बीअर कंपन्यांना पाणी देणे बंद कराजायकवाडी धरणासाठी सोडावे लागणारे पाणी नगर, नाशिक जिल्ह्यात अडवून धरल्याविषयी शेतकºयांनी संताप व्यक्त केला. या दोन जिल्ह्यांत बेकायदेशीररीत्या पाणी अडवले जाणार नाही, याचा बंदोबस्त करून पाणी जलाशयात सोडण्याची तरतूद करावी. मराठवाड्याच्या लाभक्षेत्रातील कालवे दुरुस्त करून पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. दुष्काळाच्या नावाखाली पाणी आरक्षित करून बीअर कंपन्यांना पाणी देणे बंद करण्याची मागणीही करण्यात आली.

टॅग्स :WaterपाणीFarmer strikeशेतकरी संप