शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

राजुरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: July 21, 2016 01:07 IST

राजूर : विषारी वायू गळतीमुळे पिकांची हानी झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी राजूर येथे बाजारपेठ बंद ठेवून तीन तास रास्तारोको आंदोलन केले

राजूर : विषारी वायू गळतीमुळे पिकांची हानी झालेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी राजूर येथे बाजारपेठ बंद ठेवून तीन तास रास्तारोको आंदोलन केले. दोन दिवस उलटूनही वायू गळती रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.दोन दिवसांपूर्वी राजूरजवळ विषारी वायू वाहतूक करणाऱ्या टँकरला गळती लागल्याने परिसरातील शेकडो एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मका, कपाशी, सोयाबीन, ऊस, बाजरीचे पिके काळे व पिवळे पडून नापिकी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. गेल्या तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. पुन्हा अशा संकटामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. बुधवारी सर्वपक्षीय कार्यकर्ते व आपदग्रस्त शेतकऱ्यांनी बाजारपेठ बंदचे आवाहन करून शिवाजी चौकात रास्तारोको आंदोलन करून तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली. तसेच दोन दिवस उलटूनही प्रशासनाला विषारी वायुची गळती रोखण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. उपविभागीय अधिकारी हरीश्चंद्र गवळी यांनी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या. यावर पिकांच्या पंचनाम्याला सुरूवात करून तीन महिन्यांत मदत मिळवून देण्याचे गवळी यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली. तीन तास वाहतूक व बाजारपेठ बंदमुळे प्रवासी, भाविक, नागरिकांचे मोठे हाल झाले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात माजी सभापती शिवाजीराव थोटे, मनसेचे जिल्हाध्यक्ष सांडू पुंगळे, जि.प.सदस्य रामेश्वर सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पुंगळे, सरपंच शिवाजी पुंगळे, ग्रा.पं.सदस्य दत्ता पुंगळे, श्रीमंता बोर्डे, ज्ञानेश्वर पुंगळे, श्रीरामपंच पुंगळे, देविदास पुंगळे, आप्पासाहेब पुंगळे, गणेश पुंगळे, भगवान पुंगळे, नितीन पुंगळे, नामदेव पुंगळे, विनायक पुंगळे, निवृत्ती पुंगळे, बळीराम पुंगळे, रतन ठोंबरे, नारायण पुंगळे, अनिल पुंगळे, रंजीत पुंगळे, सुरेश पुंगळे, रामेश्वर टोणपे, बंडू डवले, विजय ठोंबरे, संजय फुके, वैजीनाथ फुके, कैलास पुंंंगळे, विठ्ठल पुंगळे यांच्यासह शेकडो शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)४सर्वपक्षीय कार्यकर्ते व आपदग्रस्त शेतकऱ्यांनी बुधवारी बाजारपेठ बंदचे आवाहन करून शिवाजी चौकात रास्तारोको आंदोलन केले. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच दोन दिवस उलटूनही प्रशासनाला विषारी वायूची गळती रोखण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वायुमुळे कोवळ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने तात्काळ पंचनामे करून योग्य तो मोबदला देण्यातय यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. तहसीलदार रूपा चित्रक यांच्या आवाहनालाही शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेतकऱ्यांनी तीन तास आंदोलन तसेच घोषणाबाजी केली. परिसरातील वाहतूकही ठप्प झाली होती.