शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

जायकवाडी,घाणेवाडीचा पाणीपुरवठा झाला बंद

By admin | Updated: July 20, 2014 00:30 IST

जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे.

जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी आणि घाणेवाडी जलाशयातील पाणीपुरवठाही बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत १५ जुलैपासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने संप सुरू करून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पालिकेत जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, नामांतर विभाग, बांधकाम परवानगी देणे इत्यादी कामे बंद आहेत. त्याचप्रमाणे पाच दिवसांमध्ये ज्या भागात सार्वजनिक पाणीपुरवठा होणे आवश्यक होते, अशा जुना जालन्यातील नूतन वसाहत, कचेरी रोड, शंकरनगर, संजयनगर, ओमनगर, देहेडकरवाडी तसेच नवीन जालन्यातील दानाबाजार, गोपिकिशननगर, काद्राबाद व रामनगरचा काही भाग या ठिकाणी पाणीपुरवठा झालेला नाही. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शहरात स्वच्छतेची कामेही बंद आहेत. त्यामुळे मंगळ बाजार, शिवाजी पुतळा, महात्मा फुले मार्केट परिसर, राजमहेल टॉकिज, दे. राजा रोड, शनिमंदिर, नूतन वसाहत, देहेडकरवाडी इत्यादी भागातही कचऱ्याचे ढीग कायम आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरविकास प्रशासन कार्यालयास नगरपालिकांमधून दररोज जी माहिती द्यावी लागते, ती माहितीदेखील जाणे बंद झाले आहे. (प्रतिनिधी)नगरविकास राज्यमंत्र्यांसमवेत झालेली चर्चा निष्फळदोन दिवसांपूर्वी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंत्रालयात संघटनेच्या शिष्टमंडळाने केलेली चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेत जिल्ह्यातून डी.आर. खिल्लारे, केशव कानपुडे आदी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून पालिका कार्यालयासमोर धरणे देण्यात येत आहेत. विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते संपकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवित आहेत. संपाची धार तीव्र करण्याचा कर्मचारी संघटनेने केला निर्धारशासनाचे प्रतिनिधी म्हणून नगरविकास राज्यमंत्री तसेच या खात्याचे सचिव यांच्यासमवेत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने नगर परिषद कर्मचारी संघटनेने संपाची धार तीव्र करण्यात निर्धार केला आहे. संघटनेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी म्हटले की, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन सेवा पूर्णपणे बंद करणार आहोत. कानपुडे म्हणाले की, यापूर्वी २००६ मध्ये पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, यासाठी १६ दिवसांचा संप केला होता. त्यानंतर दीर्घकाळ संप पुकारण्याची ही दुसरी वेळ आहे. शासनाने आमच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास संप सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.