शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

जायकवाडी,घाणेवाडीचा पाणीपुरवठा झाला बंद

By admin | Updated: July 20, 2014 00:30 IST

जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे.

जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी आणि घाणेवाडी जलाशयातील पाणीपुरवठाही बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत १५ जुलैपासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने संप सुरू करून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पालिकेत जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, नामांतर विभाग, बांधकाम परवानगी देणे इत्यादी कामे बंद आहेत. त्याचप्रमाणे पाच दिवसांमध्ये ज्या भागात सार्वजनिक पाणीपुरवठा होणे आवश्यक होते, अशा जुना जालन्यातील नूतन वसाहत, कचेरी रोड, शंकरनगर, संजयनगर, ओमनगर, देहेडकरवाडी तसेच नवीन जालन्यातील दानाबाजार, गोपिकिशननगर, काद्राबाद व रामनगरचा काही भाग या ठिकाणी पाणीपुरवठा झालेला नाही. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शहरात स्वच्छतेची कामेही बंद आहेत. त्यामुळे मंगळ बाजार, शिवाजी पुतळा, महात्मा फुले मार्केट परिसर, राजमहेल टॉकिज, दे. राजा रोड, शनिमंदिर, नूतन वसाहत, देहेडकरवाडी इत्यादी भागातही कचऱ्याचे ढीग कायम आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरविकास प्रशासन कार्यालयास नगरपालिकांमधून दररोज जी माहिती द्यावी लागते, ती माहितीदेखील जाणे बंद झाले आहे. (प्रतिनिधी)नगरविकास राज्यमंत्र्यांसमवेत झालेली चर्चा निष्फळदोन दिवसांपूर्वी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंत्रालयात संघटनेच्या शिष्टमंडळाने केलेली चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेत जिल्ह्यातून डी.आर. खिल्लारे, केशव कानपुडे आदी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून पालिका कार्यालयासमोर धरणे देण्यात येत आहेत. विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते संपकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवित आहेत. संपाची धार तीव्र करण्याचा कर्मचारी संघटनेने केला निर्धारशासनाचे प्रतिनिधी म्हणून नगरविकास राज्यमंत्री तसेच या खात्याचे सचिव यांच्यासमवेत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने नगर परिषद कर्मचारी संघटनेने संपाची धार तीव्र करण्यात निर्धार केला आहे. संघटनेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी म्हटले की, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन सेवा पूर्णपणे बंद करणार आहोत. कानपुडे म्हणाले की, यापूर्वी २००६ मध्ये पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, यासाठी १६ दिवसांचा संप केला होता. त्यानंतर दीर्घकाळ संप पुकारण्याची ही दुसरी वेळ आहे. शासनाने आमच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास संप सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.