शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

जायकवाडी,घाणेवाडीचा पाणीपुरवठा झाला बंद

By admin | Updated: July 20, 2014 00:30 IST

जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे.

जालना : गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील चारही नगरपालिका कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असून त्याचा परिणाम जालना, अंबड, परतूर व भोकरदन शहरातील नागरी सेवेवर झाला आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी आणि घाणेवाडी जलाशयातील पाणीपुरवठाही बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत १५ जुलैपासून महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेने संप सुरू करून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे पालिकेत जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, नामांतर विभाग, बांधकाम परवानगी देणे इत्यादी कामे बंद आहेत. त्याचप्रमाणे पाच दिवसांमध्ये ज्या भागात सार्वजनिक पाणीपुरवठा होणे आवश्यक होते, अशा जुना जालन्यातील नूतन वसाहत, कचेरी रोड, शंकरनगर, संजयनगर, ओमनगर, देहेडकरवाडी तसेच नवीन जालन्यातील दानाबाजार, गोपिकिशननगर, काद्राबाद व रामनगरचा काही भाग या ठिकाणी पाणीपुरवठा झालेला नाही. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शहरात स्वच्छतेची कामेही बंद आहेत. त्यामुळे मंगळ बाजार, शिवाजी पुतळा, महात्मा फुले मार्केट परिसर, राजमहेल टॉकिज, दे. राजा रोड, शनिमंदिर, नूतन वसाहत, देहेडकरवाडी इत्यादी भागातही कचऱ्याचे ढीग कायम आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरविकास प्रशासन कार्यालयास नगरपालिकांमधून दररोज जी माहिती द्यावी लागते, ती माहितीदेखील जाणे बंद झाले आहे. (प्रतिनिधी)नगरविकास राज्यमंत्र्यांसमवेत झालेली चर्चा निष्फळदोन दिवसांपूर्वी नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत मंत्रालयात संघटनेच्या शिष्टमंडळाने केलेली चर्चा निष्फळ ठरली. या चर्चेत जिल्ह्यातून डी.आर. खिल्लारे, केशव कानपुडे आदी सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून पालिका कार्यालयासमोर धरणे देण्यात येत आहेत. विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते संपकऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवित आहेत. संपाची धार तीव्र करण्याचा कर्मचारी संघटनेने केला निर्धारशासनाचे प्रतिनिधी म्हणून नगरविकास राज्यमंत्री तसेच या खात्याचे सचिव यांच्यासमवेत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने नगर परिषद कर्मचारी संघटनेने संपाची धार तीव्र करण्यात निर्धार केला आहे. संघटनेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी म्हटले की, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन सेवा पूर्णपणे बंद करणार आहोत. कानपुडे म्हणाले की, यापूर्वी २००६ मध्ये पालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, यासाठी १६ दिवसांचा संप केला होता. त्यानंतर दीर्घकाळ संप पुकारण्याची ही दुसरी वेळ आहे. शासनाने आमच्या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास संप सुरूच ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.