शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

नांदेडात पाण्याची नासाडी थांबेना

By admin | Updated: March 4, 2016 23:28 IST

नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील साठा झपाट्याने कमी होत असून सध्या १४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ या पाण्यावरच पुढील पावसाळ्यापर्यंत नांदेड शहराची तहान भागणार आहे़

नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील साठा झपाट्याने कमी होत असून सध्या १४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ या पाण्यावरच पुढील पावसाळ्यापर्यंत नांदेड शहराची तहान भागणार आहे़ सबंध मराठवाडा पाणीटंचाईने होरपळून निघाला असताना नांदेडात मात्र पिण्याच्या पाण्याची मोठी नासाडी होत आहे़ तीन दिवस सुटणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक निश्चित नसल्यामुळे दोन, दोन तास नळाचे पाणी वाया जात आहे़ नळाचे पाणी नाल्यात सोडले जात असून रस्ते, अंगण, वाहने धुण्याचे प्रकार पाहण्यास मिळत आहे़ अनेक नळाला तोट्या नसल्यामुळे हे पाणी अक्षरक्ष: वाया जात आहे़ येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ यासाठी महापालिकेने पाणीबचतीचे कोणतेच धोरण अद्याप जाहीर केले नाही़ पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी प्रत्येक भागात मनपाची पथके पाहणी करणार असल्याची घोषणाही फोल ठरली आहे़ रस्त्यावर नळाचे पाणी टाकणे, नालीत पाणी सोडणे, प्राणी धुणे, वाहने धुणे, नळाला तोट्या नसणे आदी प्रकार वाढत आहेत़ अनेक नागरिकांच्या घरात बोअर व नळ असल्याने ते नळाच्या पाण्याचा उपयोग इतर कामासाठी करत आहेत़ तर दुसरीकडे ज्यांना नळाचा पाणी मिळत नाही, ते घोटभर पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत़ पाणीटंचाईचे संकट समोर असताना नागरिक पाणी बचतीचे गांभीर्य बाळगण्यास तयार नाहीत़ नागरिकांसोबतच महापालिकेकडूनही काही भागात अतिरिक्त पाणीपुरवठा होत असून काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने पाणी सोडण्याच्या वेळेत पाणीगळती व नासाडी थांबविण्याची गरज आहे़ मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद हे जिल्हे पाण्यासाठी व्याकूळ झाले आहेत़ पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे़ तर मोठ्या शहरातील नागरिकही मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत़ एकीकडे अशी परिस्थिती असताना नांदेडात मात्र पाण्याचा अपव्यय होत आहे़ रात्रीच्या वेळेस पाणी सोडले जात आहे़ त्यामुळे नागरिक आपले पाणी भरल्यानंतर नळाचे पाणी नालीत सोडून देत आहेत़ काही नागरिक तीन दिवस साठवलेले पाणी नळ सुटल्यानंतर रस्त्यावर उलटून देत आहेत़ पुन्हा पाणी भरत आहेत़ पाण्याचे महत्व अद्याप नागरिकांना कळत नसल्यामुळे येणाऱ्या काळात पाणी टंचाईचे संकट गडद होणार आहे़ सध्या विष्णूपुरी जलाशयात १३़ ५४ दलघमी पाणी उपलब्ध असून पाणीपातळी ३४८़७५ मीटरवर आहे़ एकूण क्षमतेच्या १६़७५ टक्के पाणी जलाशयात आहे़ (प्रतिनिधी)