शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार, प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील ५५० बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) ही जीपीएस प्रणालीवर आधारीत यंत्रणा ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील ५५० बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) ही जीपीएस प्रणालीवर आधारीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक बसस्थानकात स्क्रिन बसविण्यात आले आहे. त्याद्वारे प्रवाशांना प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. त्यामुळे यापुढे कित्येक तास बसस्थानकात ताटकळत बसणे थांबणार आहे.

राज्यातील सर्व बसगाड्यांना जीपीएस म्हणजे ट्रॅकिंग यंत्रणा बसविण्यात येत आहे. याद्वारे एसटी महामंडळाच्या सर्व बस जीपीएस प्रणाली आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून १०० टक्के ऑनलाइन होतील, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सोलापूर विभागात ही सिस्टिम सुरू झाली आहे. औरंगाबाद विभागात आतापर्यंत ५५० बसला जीपीएस बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या कार्यालयात संगणकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना बसचे लोकेशन दिसत आहे. लवकरच या यंत्रणेचे उद्घाटन करून ही सुविधा बसस्थानकात प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोबाइल ॲपचेही काम सुरू आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात मोबाइल ॲपद्वारे घरबसल्या प्रवाशांना बसचे लोकेशन पाहता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

-----

लवकरच प्रारंभ

औरंगाबाद विभागातील सर्व बसला व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. बसस्थानकांमध्ये स्क्रिनदेखील लावण्याचे काम करण्यात आलेले आहे. लवकरच या स्क्रिनवर बसगाड्यांचे लाेकेशन दिसण्यास सुरुवात होईल.

-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

----

बसस्थानकात लागले मोठे स्क्रिन

- शहरातील दोन्ही बसस्थानकांसह ग्रामीण भागांतील बसस्थानकांत स्क्रिन बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

- या स्क्रिनला इंटरनेटचे कनेक्शन देण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होताच स्क्रिनवर बसचे लोकेशन दिसण्यास सुरुवात होईल.

- एखादी बस कुठपर्यंत आली आहे, हे प्रवाशांना या स्क्रिनद्वारे कळू शकणार आहे. चौकशी कक्षात जाऊन बस कधी येईल, हे विचारण्याची वेळ येणार नाही.

----

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

- विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांना या यंत्रणेद्वारे बसची स्थिती कळण्यास मदत होणार आहे.

- एखाद्या ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ बस थांबली, चालक-वाहकांनी कोठे टाइमपास केला तर ते लक्षात येईल.

- अशा परिस्थितीत वेळीच चालकाला, वाहकाला समज दिली जाईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. बसगाड्यांची वेळ पाळणे या यंत्रणेमुळे सोपे होणार आहे.

---

लोकेशनसह बसची गतीही कळणार

- औरंगाबाद विभागातून धावणाऱ्या प्रत्येक बसच्या मार्गाचे मॅपिंग करण्यात आले आहे. यात बसच्या प्रत्येक थांब्यांची नोंद घेण्यात आली आहे.

-व्हीटीएस प्रणालीमुळे बसच्या लोकेशनसह वेगही कळण्यास मदत होणार आहे. ‘एसटी’ला ६५ कि.मी. प्रतितास इतक्या वेगाची मर्यादा आहे.

- वेग मर्यादेपेक्षा बसची अधिक गती झाल्यास अलर्ट मेसेज येतो. त्याद्वारे वेगावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात चालकाला सूचना, प्रसंगी कारवाईही केली जाईल.