शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार, प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील ५५० बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) ही जीपीएस प्रणालीवर आधारीत यंत्रणा ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील ५५० बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) ही जीपीएस प्रणालीवर आधारीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक बसस्थानकात स्क्रिन बसविण्यात आले आहे. त्याद्वारे प्रवाशांना प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. त्यामुळे यापुढे कित्येक तास बसस्थानकात ताटकळत बसणे थांबणार आहे.

राज्यातील सर्व बसगाड्यांना जीपीएस म्हणजे ट्रॅकिंग यंत्रणा बसविण्यात येत आहे. याद्वारे एसटी महामंडळाच्या सर्व बस जीपीएस प्रणाली आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून १०० टक्के ऑनलाइन होतील, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सोलापूर विभागात ही सिस्टिम सुरू झाली आहे. औरंगाबाद विभागात आतापर्यंत ५५० बसला जीपीएस बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या कार्यालयात संगणकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना बसचे लोकेशन दिसत आहे. लवकरच या यंत्रणेचे उद्घाटन करून ही सुविधा बसस्थानकात प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोबाइल ॲपचेही काम सुरू आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात मोबाइल ॲपद्वारे घरबसल्या प्रवाशांना बसचे लोकेशन पाहता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

-----

लवकरच प्रारंभ

औरंगाबाद विभागातील सर्व बसला व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. बसस्थानकांमध्ये स्क्रिनदेखील लावण्याचे काम करण्यात आलेले आहे. लवकरच या स्क्रिनवर बसगाड्यांचे लाेकेशन दिसण्यास सुरुवात होईल.

-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

----

बसस्थानकात लागले मोठे स्क्रिन

- शहरातील दोन्ही बसस्थानकांसह ग्रामीण भागांतील बसस्थानकांत स्क्रिन बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

- या स्क्रिनला इंटरनेटचे कनेक्शन देण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होताच स्क्रिनवर बसचे लोकेशन दिसण्यास सुरुवात होईल.

- एखादी बस कुठपर्यंत आली आहे, हे प्रवाशांना या स्क्रिनद्वारे कळू शकणार आहे. चौकशी कक्षात जाऊन बस कधी येईल, हे विचारण्याची वेळ येणार नाही.

----

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

- विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांना या यंत्रणेद्वारे बसची स्थिती कळण्यास मदत होणार आहे.

- एखाद्या ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ बस थांबली, चालक-वाहकांनी कोठे टाइमपास केला तर ते लक्षात येईल.

- अशा परिस्थितीत वेळीच चालकाला, वाहकाला समज दिली जाईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. बसगाड्यांची वेळ पाळणे या यंत्रणेमुळे सोपे होणार आहे.

---

लोकेशनसह बसची गतीही कळणार

- औरंगाबाद विभागातून धावणाऱ्या प्रत्येक बसच्या मार्गाचे मॅपिंग करण्यात आले आहे. यात बसच्या प्रत्येक थांब्यांची नोंद घेण्यात आली आहे.

-व्हीटीएस प्रणालीमुळे बसच्या लोकेशनसह वेगही कळण्यास मदत होणार आहे. ‘एसटी’ला ६५ कि.मी. प्रतितास इतक्या वेगाची मर्यादा आहे.

- वेग मर्यादेपेक्षा बसची अधिक गती झाल्यास अलर्ट मेसेज येतो. त्याद्वारे वेगावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात चालकाला सूचना, प्रसंगी कारवाईही केली जाईल.