शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
2
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
3
₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
4
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
5
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
6
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
7
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
8
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
9
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
10
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
11
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
13
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
14
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
15
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
16
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
17
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
18
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
19
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!

पर्यटन स्थळांची वाताहत थांबवा!

By admin | Updated: January 22, 2016 00:11 IST

विकास राऊत , औरंगाबाद राज्यातील औरंगाबाद हे एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र असून येथील पर्यटन स्थळांची वाताहत होत आहे.

विकास राऊत , औरंगाबादराज्यातील औरंगाबाद हे एक महत्त्वाचे, मध्यवर्ती, औद्योगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र असून येथील पर्यटन स्थळांची वाताहत होत आहे. त्यांच्या संवर्धनाकडे शासन आणि मनपाने तसेच जिल्हा प्रशासनाने मिळून लक्ष देण्याची मागणी लोकमतने केलेल्या एका पाहणीतून पुढे आली आहे.बहुतांश पर्यटन स्थळांतील साफसफाई वेळेत होत नाही. कचऱ्यांचे ढिगारे तेथेच पडलेले असतात. पिण्याचे पाणी आणि पार्किंगची सुविधा नसते. पार्किंगमध्ये बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची लूट होते. काही पर्यटन स्थळे विद्रूप केली जात आहेत. त्यांचे संरक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील ऐतिहासिक दरवाजांची पडझड होत आहे. त्यांची डागडुजी आणि देखभाल करण्यासाठी मनपाने लक्ष दिले पाहिजे. शहर व जिल्ह्यात देशी-विदेशी पर्यटक येतात. त्यांनी येथील ऐतिहासिक वास्तू पाहून समाधान व्यक्त केले पाहिजे; परंतु तसे काहीही दिसून येत नाही.काही पर्यटन स्थळांच्या आडोशाने तळीराम आपली मैफल जमवितात. त्यामुळे अनेक वास्तंूमध्ये घाणेरडा कचरा साचून राहतो. वास्तूंचे संवर्धन होण्यासाठी जनजागृतीची गरजदेखील सर्व्हेतून पुढे आली आहे. ४०० वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक वास्तू आजही आहेत; परंतु त्या पूर्णरूपात नसून त्यांची पडझड होत आहे. ५२ दरवाजांचे हे शहर नावापुरते राहण्याची शक्यता पुढील काळात नाकारता येत नाही. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. औरंगाबाद शहराचे जुने नाव खडकी असे होते. इतिहासकारांनी मलिक अंबर याने हे शहर वसविल्याचे नमूद केले आहे. सुरक्षारक्षक असावेतऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि स्वच्छता अबाधित राहावी, यासाठी शासन, महापालिका आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. पर्यटनाची माहिती सर्वत्र देण्यासाठी नागरिकांनीदेखील शहराचा नावलौकिक सांगितला पाहिजे.अनेक पर्यटन स्थळे सुरक्षारक्षकांअभावी आहेत. त्यामुळे तेथील वास्तूंची नासधूस होत आहे. वास्तूंच्या भिंतीवर कुठलाही मजकूर लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. अजिंठा, वेरूळ, पितळखोरा आणि विद्यापीठ परिसरात औरंगाबाद लेण्या आहेत. गौताळा हे अभयारण्य आहे. सारोळा आणि म्हैसमाळ ही हिलस्टेशन्स शहरापासून काही अंतरावर आहेत. विद्यापीठ परिसरात सोनेरी महल आणि इतर काही ऐतिहासिक वास्तू आहेत. तेथून काही अंतरावर बीबी का मकबरा आहे. मकबऱ्यापासून १ कि़ मी.अंतरावर पाणचक्की आहे. शहरातील ५२ पैकी काही दरवाजे नामशेष झाले असून भडकल, रोशन, मकई, दिल्ली, महेमूद, बारापुल्ला यासारखे काही दरवाजे अजूनही टिकून आहेत. टाऊन हॉल इमारत मनपाने संवर्धन केली आहे. दौलताबाद येथील देवगिरी किल्ला, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर, शिवाजी पुराणवस्तुसंग्रहालय, सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय, सलीम अली सरोवर, खुलताबाद येथील औरंगजेबची कबर, पैठण येथील धरण व नाथ मंदिर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे औरंगाबाद शहर व जिल्ह्यात आहेत.