शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

कपाशी बियाणांची विक्री तूर्तास थांबवा; औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:51 IST

पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीमुळे झाडांची वाढ खुंटते व कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापसाच्या बियाणांची विक्री न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेतकरी पूर्व हंगामी कापसाची २५ मे ते ७ जूनदरम्यान लागवड करतात. कापूस पिकाची पूर्वहंगामी लागवड केली त्या भागात कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले.

औरंगाबाद : पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीमुळे झाडांची वाढ खुंटते व कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापसाच्या बियाणांची विक्री न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. 

जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेतकरी पूर्व हंगामी कापसाची २५ मे ते ७ जूनदरम्यान लागवड करतात. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कापसाच्या पिकावर झालेला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता पूर्वहंगामी कापूस लागवड टाळणे हे शेतकऱ्यांसाठी हिताचे राहील. मागील वर्षी जिल्ह्यातील सोयगाव व इतर बागायती क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाची पूर्वहंगामी लागवड केली त्या भागात कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले. मागील काही वर्षांत मे महिन्यातील वाढलेल्या तापमानामुळे जमिनीचे तापमाण वाढत आहे.

मे महिन्याताील उष्णतेमुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसतो. त्यामुळे पूर्वहंगामी कापसाची उगवण व मुळाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जमिनीतील प्रचंड उष्णतेमुळे कोवळ्या मुळांच्या पेशींच्या वाढीवर परिणाम झाल्यामुळे मुळाद्वारे अन्नद्रव्यांच्या वहनामध्ये अडचण निर्माण होऊन झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे पानांच्या कडावर लालसर छटा दिसतात. भविष्यात वाढ न होता ती झाडे मरतात. मागील हंगामात २५ मे ते ५ जूनदरम्यान सोयगाव तालुक्यातील पळाशी या गावामध्ये लागवड झालेल्या कापसावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. दुसरीकडे, ५ जूननंतर लागवड झालेल्या कापसाची वाढ  समाधानकारक झाल्याचे दिसून आले.

या दोन्ही कारणांमुळे पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड चालू वर्षात टाळून येणाऱ्या हंगामात पुरेसा पाऊस (५० ते १०० मिमी) झाल्यानंतरच मृग नक्षत्रामध्ये १५ जूनपासून लागवड केल्यास सुवर्णमध्य साधून पिकाच्या वाढीवर होणारा अनिष्ट परिणाम टाळता येईल. 

१५ जूननंतर कपाशीची लागवड करा१५ जूननंतर कापसाच्या पिकाची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्थेतून येणाऱ्या पतंगांची पिढी नष्ट होते व या अळीचा प्रादुर्भावही कमी करण्यास मदत होईल.त्यामुळे कृषी विभागाने पूर्वहंगामी कापूस लागवड होऊ नये, यासाठी सद्य:स्थितीत कापूस बियाणांची विक्री थांबविण्याचे आवाहन केले आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार व उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र