शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
3
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
4
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
5
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
6
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
7
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
8
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
9
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
10
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
11
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
12
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
13
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
14
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
15
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
16
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
17
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
18
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
19
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

कपाशी बियाणांची विक्री तूर्तास थांबवा; औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:51 IST

पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीमुळे झाडांची वाढ खुंटते व कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापसाच्या बियाणांची विक्री न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेतकरी पूर्व हंगामी कापसाची २५ मे ते ७ जूनदरम्यान लागवड करतात. कापूस पिकाची पूर्वहंगामी लागवड केली त्या भागात कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले.

औरंगाबाद : पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीमुळे झाडांची वाढ खुंटते व कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापसाच्या बियाणांची विक्री न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. 

जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेतकरी पूर्व हंगामी कापसाची २५ मे ते ७ जूनदरम्यान लागवड करतात. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कापसाच्या पिकावर झालेला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता पूर्वहंगामी कापूस लागवड टाळणे हे शेतकऱ्यांसाठी हिताचे राहील. मागील वर्षी जिल्ह्यातील सोयगाव व इतर बागायती क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाची पूर्वहंगामी लागवड केली त्या भागात कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले. मागील काही वर्षांत मे महिन्यातील वाढलेल्या तापमानामुळे जमिनीचे तापमाण वाढत आहे.

मे महिन्याताील उष्णतेमुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसतो. त्यामुळे पूर्वहंगामी कापसाची उगवण व मुळाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जमिनीतील प्रचंड उष्णतेमुळे कोवळ्या मुळांच्या पेशींच्या वाढीवर परिणाम झाल्यामुळे मुळाद्वारे अन्नद्रव्यांच्या वहनामध्ये अडचण निर्माण होऊन झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे पानांच्या कडावर लालसर छटा दिसतात. भविष्यात वाढ न होता ती झाडे मरतात. मागील हंगामात २५ मे ते ५ जूनदरम्यान सोयगाव तालुक्यातील पळाशी या गावामध्ये लागवड झालेल्या कापसावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. दुसरीकडे, ५ जूननंतर लागवड झालेल्या कापसाची वाढ  समाधानकारक झाल्याचे दिसून आले.

या दोन्ही कारणांमुळे पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड चालू वर्षात टाळून येणाऱ्या हंगामात पुरेसा पाऊस (५० ते १०० मिमी) झाल्यानंतरच मृग नक्षत्रामध्ये १५ जूनपासून लागवड केल्यास सुवर्णमध्य साधून पिकाच्या वाढीवर होणारा अनिष्ट परिणाम टाळता येईल. 

१५ जूननंतर कपाशीची लागवड करा१५ जूननंतर कापसाच्या पिकाची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्थेतून येणाऱ्या पतंगांची पिढी नष्ट होते व या अळीचा प्रादुर्भावही कमी करण्यास मदत होईल.त्यामुळे कृषी विभागाने पूर्वहंगामी कापूस लागवड होऊ नये, यासाठी सद्य:स्थितीत कापूस बियाणांची विक्री थांबविण्याचे आवाहन केले आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार व उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र