शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

कपाशी बियाणांची विक्री तूर्तास थांबवा; औरंगाबाद जिल्हा परिषदेकडून आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:51 IST

पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीमुळे झाडांची वाढ खुंटते व कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापसाच्या बियाणांची विक्री न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेतकरी पूर्व हंगामी कापसाची २५ मे ते ७ जूनदरम्यान लागवड करतात. कापूस पिकाची पूर्वहंगामी लागवड केली त्या भागात कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले.

औरंगाबाद : पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीमुळे झाडांची वाढ खुंटते व कापसाच्या पिकावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी सद्य:स्थितीत कापसाच्या बियाणांची विक्री न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. 

जिल्ह्यात कापूस हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेतकरी पूर्व हंगामी कापसाची २५ मे ते ७ जूनदरम्यान लागवड करतात. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कापसाच्या पिकावर झालेला शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता पूर्वहंगामी कापूस लागवड टाळणे हे शेतकऱ्यांसाठी हिताचे राहील. मागील वर्षी जिल्ह्यातील सोयगाव व इतर बागायती क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी कापूस पिकाची पूर्वहंगामी लागवड केली त्या भागात कापसाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे आढळून आले. मागील काही वर्षांत मे महिन्यातील वाढलेल्या तापमानामुळे जमिनीचे तापमाण वाढत आहे.

मे महिन्याताील उष्णतेमुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसतो. त्यामुळे पूर्वहंगामी कापसाची उगवण व मुळाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जमिनीतील प्रचंड उष्णतेमुळे कोवळ्या मुळांच्या पेशींच्या वाढीवर परिणाम झाल्यामुळे मुळाद्वारे अन्नद्रव्यांच्या वहनामध्ये अडचण निर्माण होऊन झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे पानांच्या कडावर लालसर छटा दिसतात. भविष्यात वाढ न होता ती झाडे मरतात. मागील हंगामात २५ मे ते ५ जूनदरम्यान सोयगाव तालुक्यातील पळाशी या गावामध्ये लागवड झालेल्या कापसावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. दुसरीकडे, ५ जूननंतर लागवड झालेल्या कापसाची वाढ  समाधानकारक झाल्याचे दिसून आले.

या दोन्ही कारणांमुळे पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड चालू वर्षात टाळून येणाऱ्या हंगामात पुरेसा पाऊस (५० ते १०० मिमी) झाल्यानंतरच मृग नक्षत्रामध्ये १५ जूनपासून लागवड केल्यास सुवर्णमध्य साधून पिकाच्या वाढीवर होणारा अनिष्ट परिणाम टाळता येईल. 

१५ जूननंतर कपाशीची लागवड करा१५ जूननंतर कापसाच्या पिकाची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्थेतून येणाऱ्या पतंगांची पिढी नष्ट होते व या अळीचा प्रादुर्भावही कमी करण्यास मदत होईल.त्यामुळे कृषी विभागाने पूर्वहंगामी कापूस लागवड होऊ नये, यासाठी सद्य:स्थितीत कापूस बियाणांची विक्री थांबविण्याचे आवाहन केले आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार व उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र