शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पंढरपुरात मातंग समाजातर्फे रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:07 IST

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण व जलसमाधी घेतलेल्या संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी मातंग समाजातर्फे पंढरपुरातील तिरंगा चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला.

वाळूज महानगर : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण व जलसमाधी घेतलेल्या संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी मातंग समाजातर्फे पंढरपुरातील तिरंगा चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी महामार्ग अडवून शासनाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राज्य घटनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, या आरक्षणाचा मातंग समाजाला योग्य प्रमाणात लाभ मिळत नाही. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिला आहे. सदर आरक्षणातून मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, यासाठी समाजातर्फे अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. परंतू या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संजय ताकतोडे या तरुणाने जलसमाधी घेवून आपली जीवन यात्रा संपविली. या घटनेच्या निषेधार्थ तसेच वरील मागण्यांसाठी मातंग समाजातर्फे पंढरपूर तिरंगा चौकात शुक्रवारी साडेअकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.

यावेळी आंदोलनकांनी औरंगाबाद-नगर महामार्गावर १० मिनिटे ठिय्या दिला. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांना मागण्याचे निवेदन देवून आंदोलन मागे घेतले. आंदोलनात संजय मिसाळ, अर्जुन गालफाडे, नाना कांबळे, मारुती गायकवाड, विलास सौदागर, सुशिल रणनवरे, प्रकाश शेजवळ, ज्ञानेश्वर नाडे, सुनिल जोगदंड, विकास आव्हाड, सूर्यकांत नवगिरे, सोपान कांबळे, सिंधुबाई रणनवरे, मुक्ता खरे, नंदा आव्हाड, प्रमिला नाडे, साधना साबळे, मीना घुले, अरुणा भालेराव, कांता वाघमारे आदींची उपस्थिती होती. दरम्यान आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Walujवाळूज