शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिभेचे लाड थांबवा, अतितिखट, मसालेदार पदार्थांमुळे होऊ शकतो अल्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:03 IST

औरंगाबाद : दररोजच्या जेवणात जर अतितिखट आणि मसालेदार पदार्थांचा समावेश असेल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. सातत्याने हे ...

औरंगाबाद : दररोजच्या जेवणात जर अतितिखट आणि मसालेदार पदार्थांचा समावेश असेल, तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. सातत्याने हे पदार्थ आहारात असल्यास अल्सरला सामोरे जाण्याची जास्त शक्यता असते. त्याकरिता जिभेचे लाड थांबवा आणि सकस आहारच घ्या, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

बदलत्या जीवनशैलीने जेवणाच्या वेळा पाळणे अशक्य होत आहे. रोजच्या आहारात जंकफूड, अतितिखट, मसालेदार पदार्थांचा समावेश वाढत आहे. परिणामी, अनेकांना अल्सरच्या दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. अल्सर होण्यासाठी असलेल्या अनेक कारणांमध्ये सातत्याने तिखट, मसालेदार पदार्थ खाणे, हेही एक कारण आहे. अल्सर म्हणजे सर्वसाधारणपणे एक प्रकारची जखमच. सर्वसाधारणपणे या जखमा जठराला किंवा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात (ड्युओडेन) होतात. औषधी, गोळ्यांनी अल्सर बरा होतो; परंतु गुंतागुंत अवस्था, रक्तस्राव आणि लहान आतडे एकदम छोटे झाल्यास शस्त्रक्रिया करण्याची वेळ ओढावली जाते.

काय आहेत लक्षणे........................

- पोट दुखणे, जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, भूक मंदावणे, वजनात अचानक घट होणे, दुखण्यामुळे रात्रीतून उठून बसणे, उलटीतून रक्त पडणे आदी.

------

काेणती काळजी घ्यावी?

१) वेळेवर जेवण घेतले पाहिजे. कमी प्रमाणात तिखट खावे. अत्यावश्यक असेल तरच डाॅक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशमन गोळ्या घेतल्या पाहिजे, असे घाटीतील शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सरोजिनी जाधव यांनी सांगितले.

२) अनियमित खाण्याची सवय बदलली पाहिजे. धूम्रपान, मद्यपान आणि रात्रीचे जागरण टाळले पाहिजे.

३) सध्या चांगल्या प्रकारची औषधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शस्त्रक्रियेची वेळ टळण्यास मदत होते. १० ते २० टक्के लोकांना गुंतागुंत स्थितीमुळे शस्त्रक्रिया करण्याची वेळ ओढावते.

------

पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा

वेळेवर झोप घेणे, वेळेवर सकस आहार घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे. दैनंदिनी कशी आहे, यावर आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे नियमित व्यायाम केला पाहिजे. वेळेवर झोप घेतली पाहिजे.

- डाॅ. पंकज वैरागड, घाटी रुग्णालय

----

दररोज अतितिखट, मसालेदार, जंकफूड खाल्ले, तर निश्चितच कधी ना कधी त्याचा शरीरावर परिणाम होतो. हे पदार्थ रोज खाणे टाळले पाहिजे. आतडी, जठराला जखम झालेली असेल, तर भात, खिचडी असे मऊ पदार्थ खावेत.

- रश्मी जोशी, आहारतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय