शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

राज्याचे उद्योगस्नेही धोरण फक्त कागदोपत्रीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:24 IST

उद्योगांसाठी जमिनीची उपलब्धता, एक खिडकी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव,  पर्यावरणीय मंजुरीतील अडचण, पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष या सगळ्यांमुळे महाराष्ट्र उद्योगस्नेही वातावरण निर्मितीत मागे पडत आहे.  

ठळक मुद्दे राज्यात लालफितीचा कारभार वाढला आहे, असे मत औद्योगिक संघटना आणि उद्योजकांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : उद्योगांसाठी जमिनीची उपलब्धता, एक खिडकी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव,  पर्यावरणीय मंजुरीतील अडचण, पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष या सगळ्यांमुळे महाराष्ट्र उद्योगस्नेही वातावरण निर्मितीत मागे पडत आहे.  राज्यात लालफितीचा कारभार वाढला आहे. त्यातूनच ‘इज आॅफ डुइंग’मध्ये महाराष्ट्र १३ व्या स्थानी फेकला गेला आहे, असे मत औद्योगिक संघटना आणि उद्योजकांनी व्यक्त केले.

इज आॅफ डुइंग बिझनेससाठी वर्ल्ड बँकेने देशावर स्तुतिसुमने उधळली; परंतु आर्थिक राजधानी ज्या राज्यात आहे, त्याच महाराष्ट्राचे तीनतेरा झाल्याचे समोर आले. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने तयार केलेल्या अहवालात महाराष्ट्र १३ व्या स्थानावर गेल्याचे मंगळवारी समोर आले. झारखंडसह नव्याने झालेले तेलगंणा राज्यही महाराष्ट्राच्या पुढे आहे. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योगांना माहिती देण्यासंदर्भातील पारदर्शकता, एक खिडकी सुविधा, बांधकाम प्रकल्पांना मंजुरी, जमिनीची उपलब्धता, पर्यावरणीय मंजुरी या श्रेणींद्वारे हा अहवाल जाहीर झाला.   क्रमवारीत महाराष्ट्रापेक्षा पुढे असलेली राज्यांनी उद्योगाभिमुख वातावरण निर्मिती केली आहे. महाराष्ट्रात परवानग्यांसाठी विलंब होतो. त्या एकाच छताखाली मिळत नाहीत. आॅनलाईन सुविधाही मिळत नाहीत. उद्योजकांसाठी जमिनी नसल्याचे सांगितले जाते. आजघडीला औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये सुधारणा झाली तरच राज्याची क्रमवारीत सुधारणा होईल, असे उद्योजकांनी म्हटले. 

अनेक समस्यापरदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पुढे आहे; परंतु सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महाराष्ट्रात उद्योग वाढले पाहिजेत. त्यासाठी नवनवीन उद्योग आले पाहिजेत. उद्योगांना स्थिर होण्यासाठी काही अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु उद्योगांना सहजपणे स्थिर होता आले पाहिजे. त्यासाठी असलेल्या अडचणी दूर कराव्या लागतील. त्यामुळे राज्य सरकारला काम करावे लागेल, तरच महाराष्ट्राच्या क्रमवारीत सुधारणा होईल.-प्रसाद कोकीळ, माजी अध्यक्ष, सीएमआयए

पायाभूत सुविधांकडे दुर्लक्षऔद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी अशा मूलभूत आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्याशिवाय नवीन गुंतवणूक होणार नाही. शासनाला कराच्या माध्यमातून उत्पन्न देणाऱ्या उद्योगांना एमआयडीसीत जागा मिळत नाही. सध्याच्या उद्योगांच्या अडचणी दूर झाल्या, तर चांगले वातावरण निर्मिती होईल. त्यामुळे पायाभूत सुविधांवर लक्ष कें द्रित करावे लागेल.-किशोर राठी, अध्यक्ष, मसिआ

परवानग्यांना विलंबइज आॅफ डुइंग बिझनेसमध्ये उद्योगांसाठी किती लवकरच जमीन मिळते. पाणी, वीज सेवा आणि परवानग्या, अशा पायाभूत सुविधांना लागणारा वेळ पाहिला जातो. महाराष्ट्रात यासाठी अधिक विलंब होतो. उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या अधिक आहे. राज्यात एकाच छताखाली या परवानग्या मिळत नाहीत. शिवाय त्या आॅनलाईनदेखील नाहीत. लालफितीचा कारभार दिसतो. इतर राज्यांनी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबविली आहे, अशी प्रगती महाराष्ट्रातही होणे आवश्यक आहे.-आशिष गर्दे, माजी अध्यक्ष, सीएमआयए

धोरण कागदोपत्रीउद्योग करण्यासाठी केवळ उद्योगावर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे. त्यासाठी सगळ्या आवश्यक गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध होणे आवश्यक असते. त्याबरोबर पुढील पाच वर्षांच्या पायाभूत सुविधा विकसित करणे महत्त्वाचे ठरते. पूर्वी इतर राज्यांत फारसे औद्योगीकरण नव्हते; परंतु आता स्पर्धा वाढली आहे. त्यात महाराष्ट्र मागे पडत आहे. राज्यात उद्योगांचे धोरण कागदोपत्रीच राहते. त्याचा लाभ उद्योगांना मिळत नाही. त्यामुळे उद्योगस्नेही वातावरणात राज्य मागे पडत आहे.-सुनील किर्दक, उद्योजक 

टॅग्स :MIDCएमआयडीसीState Governmentराज्य सरकारbusinessव्यवसाय