शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

सरकार मराठा, ओबीसी समाजाला गाजर दाखवत आहे; अंबादास दानवे यांचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: July 15, 2024 19:34 IST

सरकार जेव्हा अडचणीत असते तेव्हा त्यांना विरोधी पक्ष आठवतो: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगरः मराठा आरक्षणाचे नेते  मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणाचा इशारा द्यावा लागला. हे सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला गाजर दाखवत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते आ. अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी राज्यसरकारने बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्यामुळे  तुमच्यावर टिका होत आहे, याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आम्ही आधीपासून म्हणतो की, मराठा आरक्षणाविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मात्र सरकार त्यांची  भूमिका स्पष्ट करत नाही. सरकार जेव्हा अडचणीत असते तेव्हा त्यांना विरोधी पक्ष आठवतो, अशी टिकाही आ.दानवे यांनी केली. आमच्या पक्षप्रमुखांनी आधीच आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

महायुतीच्या सरकारने बजेटपेक्षा दहा पट खर्चाच्या निविदा काढल्यामहायुतीचे सरकार हे टक्क्केवारीचे सरकार असल्याचा आरोप करीत आ.दानवे म्हणाले की,सार्वजनिक बांधकाम विभागासाठी केवळ १८ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना राज्य सरकारने या विभागाच्या सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निविदा काढल्या आहेत. यामुळे आर्थिक ताळमेळ नसलेले हे सरकार आहे.

विधीमंंडळात मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविलाआ. दानवे म्हणाले की, काल परवा संपलेले राज्य विधीमंडळाचे अधिवेशन हे या सरकारचे शेवटचे अधिवेशन होते. विरोधी पक्षनेता म्हणून आपण मराठवाड्यासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी पीक विमा, गर्भलिंग निदान चाचणीचे नुकतेच उघडकीस आलेली प्रकरणे, सातारा परिसरातील रहिवाशांना करण्यात येत असलेली गुंठेवारीची सक्ती संदर्भातही आवाज उठविल्याचे ते म्हणाले. 

जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवरनुकत्याच पकडण्यात आलेल्या इसिस संबंधित अतिरेक्यांच्या टार्गेटवर जगप्रसिद्ध वारसास्थळ असलेली वेरूळची लेणी असल्याचे समोर आले आहे. असे असताना केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांच्या सुरक्षेसंदर्भात  गंभीर नसल्याचा आरेाप आ.दानवे यांनी केला. ते म्हणाले की,मागील वर्षभरात सुमारे २५ लाख पर्यटकांनी लेण्यांना भेटी दिल्या. यात विदेशी पर्यटकांची संख्याही अधिक हाेती. यामुळे अजिंठा आणि वेरूळ लेण्या, बीबी का मकबरा च्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आपण शासनाकडे केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबाद