शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

उद्योगांना राज्य सरकारचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:27 IST

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२५ मधील पंचायत क्षेत्रातील उद्योगांनी संबंधित पंचायतींना ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्याबाबतची तरतूद वगळण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे इज आॅफ बिझनेस डुइंगला तडा जाण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२५ मधील पंचायत क्षेत्रातील उद्योगांनी संबंधित पंचायतींना ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्याबाबतची तरतूद वगळण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे इज आॅफ बिझनेस डुइंगला तडा जाण्याची शक्यता आहे.कलम १७६ च्या पोट कलम (२) च्या खंड (२७) अन्वये कलम १२५ च्या संदर्भात नियम करण्याची असलेली तरतूद वगळण्यासही शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागणार असल्याची भीती औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त होत असून उद्योगाला दिलेला दणकाच आहे, असे बोलले जात आहे. औरंगाबाद परिसरात वाळूज, शेंद्रा, चितेगाव, रांजणगाव येथील औद्योगिक वसाहती ग्रामपंचायत हद्दीत असून, तेथील उद्योगांना या निर्णयामुळे नुकसानच होणार आहे. शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क नियम १९६० मध्ये सुधारणा केली आहे. डिसेंबर २०१५ च्या अधिसूचनेनुसार पूर्वी असलेल्या निवासी वापराच्या निर्धारित दराच्या दुप्पट दराऐवजी औद्योगिक वापरासाठी निवासी वापराच्या १.२० पट असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. हे निश्चित झालेले प्रमाण तसेच करप्रणालीचे सुलभीकरण व सर्वत्र जकात कर लागू नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १२५ मधील उद्योगांनी ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्याबाबतची तरतूद वगळण्यात आली आहे. कलम १७६ च्या पोट कलम (२) च्या खंड (२७) अन्वये कलम १२५ संदर्भात नियम करण्याची असलेली तरतूद वगळण्यास तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत (कारखान्यांनी ठोक रकमेच्या स्वरूपात अंशदान देण्याबाबत) नियम १९६१ वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.वाणिज्य, व्यावसायिक, औद्योगिक वापरासाठी यापूर्वी निवासी वापराच्या दुप्पट दराने मालमत्ता कर आकारणी करण्यात येत होती. मागील तीन वर्षांतील एकत्रित शुल्क विचारात घेऊन त्याच्या ५० ते ७० टक्के मर्यादेपर्यंत उद्योगांकरिता ठोक रकमेची अंशदानाची रक्कम निश्चित करण्यात येत होती. ठोक करार करण्याकरिता लागणारा कालावधी व त्यासाठी राबविण्यात येणारी सरकारी पद्धतही अतिशय किचकट होती, असे शासनाचे मत आहे.