शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्य सरकार बेफिकीर

By admin | Updated: May 19, 2015 00:47 IST

उस्मानाबाद : राज्यात शेतकऱ्यांचे धान्य कवडीमोल भावाने खरेदी केले जात असून, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे आणि खत उपलब्ध करुन देण्यातही शासनाला अपयश आल्याचे सांगत

उस्मानाबाद : राज्यात शेतकऱ्यांचे धान्य कवडीमोल भावाने खरेदी केले जात असून, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे आणि खत उपलब्ध करुन देण्यातही शासनाला अपयश आल्याचे सांगत, सेना-भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बेफिकीर असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना केला.विखे-पाटील यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, लक्ष्मण सरडे, नितीन बागल आदींची उपस्थिती होती. आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. मात्र त्यावेळी तत्कालीन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शासनाने खरीप, रबी हंगामातील पिकांच्या नुकसानीची भरपाई गारपिटीच्या अनुदानासह तात्काळ दिली. मात्र सेना-भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत असल्याचे ते म्हणाले. सततची नापिकी आणि पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने बळीराजा कर्जबाजारी झाला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींच्या लग्नासाठी हातावर पैसा नसल्याने त्याला नैराश्य आले आहे. ही बाब दुर्दैैवी असल्याचे सांगत, या सर्व प्रकाराला सेना-भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी यावेळी केला. जिल्हा पाणी टंचाईसह दुष्काळाने होरपळत असताना तसेच चाराटंचाई तीव्र असतानाही शासनाने एकही चारा छावणी सुरु केली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.