शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

...म्हणून राज्य सरकारला भरावा लागणार ६० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 04:18 IST

औरंगाबाद खंडपीठ; परभणी जिल्ह्यातील प्रकरण

- डॉ. खुशालचंद बाहेतीऔरंगाबाद : २००५ मध्ये हरवलेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्यात १३ वर्षांनंतरही अपयश आल्याने औरंगाबाद खंडपीठाने शासनाला ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.गंगाधर पाटील हे कापूस व्यापारी होते. गंगाखेडचे (परभणी) तत्कालीन आमदार विठ्ठल गायकवाड यांच्याशी त्यांचा पैशावरून वाद सुरू झाला. आपले ५३ लाखांचे देणे मिळावे, यासाठी त्यांनी गायकवाड भालकी (कर्नाटक) येथील अमृत महाराज यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. त्यानुसार, २० मे २००५ रोजी देगलूर येथून अमृत महाराज व गंगाधर पाटील हे गंगाखेड येथे विठ्ठल गायकवाड यांच्या घरी आले. तेथून पाटील हे गायकवाड यांच्यासोबत जिनिंगला जाण्यासाठी निघाले. तेव्हापासून पाटील गायब आहेत.या प्रकरणात गंगाधर पाटील यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात अ‍ॅड. पी.पी. मंडलिक यांच्यामार्फत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. २००६मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अमृत महाराज यांना २०१४मध्ये अटक करण्यात आली. कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात गंगाधर पाटील हे विठ्ठल गायकवाड व इतरांसोबत गेल्याचे नमूद केले आहे. मात्र, पोलिसांनी अमृत महाराजांशिवाय कोणालाही ताब्यात घेतले नाही. याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.न्यायालयाने या प्रकरणात वेळोवेळी आदेश दिले. मात्र, शासन या प्रकरणात आपली जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे नमूद करून शासनाने ३० दिवसांत ६० लाख रुपये न्यायालयात जमा करावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रक्कम याचिकाकर्त्यांना देण्याबाबत सविस्तर सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारAurangabadऔरंगाबाद