शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

शेतकऱ्यांचे राज्य आले पाहिजे

By admin | Updated: September 12, 2014 00:08 IST

परभणी: महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

परभणी: महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी आत्महत्या करीत नव्हते. कारण त्यांना माहीत होते की, माझा राजा माझ्या पाठीशी आहे. पण आता शेतकऱ्यांना माहीत झालंय की, त्यांच्या पाठीशी कोणीही नाही. त्यासाठी शेतकऱ्यांचे राज्य आले पाहिजे, असे प्रतिपादन महानाट्य लेखक प्रा.नितीन बानगुडे यांनी केले.परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा मेळावा ११ सप्टेंबर रोजी कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात पार पडला. व्यासपीठावर खा. संजय जाधव, आयोजक तथा जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, युवासेना संपर्कप्रमुख डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख अजित वरपूडकर, माणिक पोंढे, दशरथ भोसले, सखुबाई लटपटे, नंदू अवचार, काशिनाथ काळबांडे, रवींद्र धर्मे, अमित गिते, आर्जून सामाले, ज्ञाानेश्वर पवार, सुधाकर खराटे, संदीप भंडारी, राजूृ कापसे, बालासाहेब जाधव, अनिल डहाळे, अंजली पवार, कुसूम पिल्लेवार, कमलबाई कासले, सुनिता घाडगे, सदाशिव देशमुख आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक गंगाप्रसाद आणेराव यांनी केले. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बानगुडे म्हणाले, ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केले. सामर्थ्य शक्तीत याचा वापर देशासाठी करायचा आहे, याची जाणीव शिवाजी महाराजांना झाली होती. परंतु, त्यानंतर शिवाजी महाराज विस्मरणात गेल्यानेच इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. पुन्हा संयुक्त महाराष्ट्रानंतर एका माणसाला कळाले की, शिवाजी महाराजांचे विस्मरण होता कामा नये, म्हणून त्या माणसाने शिवसेना नावाची संघटना काढली. सन्मानाने जगायला शिकविले. त्या माणसाचे नाव म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असे म्हणताच शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी बानगुडे यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. खा. संजय जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास दगडू काळदाते, गोपीनाथ झाडे, मारोती बनसोडे, देवेंद्र देशमुख, महेश चौधरी, सचिन पाटील, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, उदय देशमुख, गोविंद पारटकर, शेख कलीम, गजानन देशमुख, भास्कर देवडे, विलास अवकाळे, प्रमोद गायकवाड, बबन धरणे, रामप्रसाद रणेर आदींसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)