शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्य उत्पादन शुल्कचा महसूल घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:53 IST

ग्रामीण भागात २२० मीटरच्या आत बिअर बार, देशी दारु वाईन शॉपची दुकाने चालविण्यास बंदी घातल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. नागपूर खंडपीठाच्या २९ नोव्हेंबर रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागातील दुकाने सुरु करण्यासाठी विक्रेते वरिष्ट स्तरापर्यंत प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्दे२९ नोव्हेंबरच्या निकालाकडे लक्ष : देशी- विदेशी पिणाºयांना मिळणार एकाच ठिकाणी दोन्ही ‘बॅ्रंण्ड’

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागात २२० मीटरच्या आत बिअर बार, देशी दारु वाईन शॉपची दुकाने चालविण्यास बंदी घातल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महसूल मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. नागपूर खंडपीठाच्या २९ नोव्हेंबर रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागातील दुकाने सुरु करण्यासाठी विक्रेते वरिष्ट स्तरापर्यंत प्रयत्न करीत आहेत.हिंगोली जिल्ह्यात एकूण १७४ दुकांनाना मंजुरी आहे. यामध्ये बिअर बार ७५, देशी ४०, बिअर शॉपी ६५, वाईन शॉप ४ एवढी दुकानांची संख्या आहे. यावरच शासनाला सर्वाधिक जास्त महसूल मिळतो. मात्र ग्रामीण भागात महामार्गापासून २२० मीटरच्या आत दुकाने चालविण्यावर बंदी असल्याने मोठ्या प्रमाणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात घट होत आहे. सद्यस्थितीत बिअर बार ४४, वाईन शॉप ४, बिअर शॉपी २५, देशी ३६ अशी एकूण १२९ दुकाने सुरु आहेत. ग्रामीण भागातील महामार्गाजवळील दुकाने सुरु करण्याचा कोर्टाचा निकाल लागलेला नाही. ग्रामीण भागातील दुकाने सुरु करण्याच्या मागणीसाठी परवानाधारक दारुविक्रीच्या व्यवसायिक युनियनच्या वतीने वरिष्टापर्यंत प्रयत्न केले जात आहेत. मात्र अजून तरी त्याला यश आलेले नसल्याने महसुलमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालय, दारु विक्री, (एक्साईज) महसूल विभाग, उपप्रादेशिक परिवहन, ‘सेल टॅक्स’ ही कार्यालयाले टॉप- ५ म्हणून ओळखली जातात. या विभागाकडून शासनाला सर्वाधिक जास्त महसूल मिळतो. मात्र २२० मीटरच्या आतील दुकानावर बंदी घातल्याने महसूल गोळा होत नसल्याचे समोर आले आहे. तसेच ग्रामीण भागात दारुविक्रीच होत नसल्याने ग्रामीण भागातील तळीराम शहरी ठिकाणी दारु पिण्यास येत आहेत. तर ये- जाचे तिकिट निघावे म्हणून दारुच्या बाटल्या सोबत नेत आहेत.अशा परिस्थितीत पार्सल घेऊन जाणारी व्यक्ती कधी पोलिसांच्या तावडीत सापडलीच तर त्याचा केस पेपर बनविला जात आहे.