शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

गरीब विद्यार्थ्यांची उपासमार; वसतिगृहांना अनुदान मिळणार कधी

By विजय सरवदे | Updated: November 30, 2023 12:58 IST

जिल्ह्यात एकूण ५६ अनुदानित वसतिगृहे असून यात दोन हजार विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची सुविधा मिळते.

छत्रपती संभाजीनगर : मागील पाच महिन्यांपासून अनुदानाअभावी समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांचे इमारत भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, आठवडाभरापूर्वी अनुदानाची रक्कम प्राप्त झाली. पण ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे अद्याप एकाही वसतिगृहापर्यंत हे अनुदान पोहोचलेले नाही, अशी खंत वसतिगृहचालकांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात एकूण ५६ अनुदानित वसतिगृहे असून यात दोन हजार विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची सुविधा मिळते. कामकाजासाठी अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार, मदतनीस जवळपास २५० कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर कार्यरत आहेत. जून-जुलैमध्ये पहिल्या टप्प्यात समाज कल्याण विभागाकडून ६० टक्के अग्रिम अनुदान दिले जाते, तर फेब्रुवारी- मार्च महिन्यात वसतिगृहांची तपासणी झाल्यानंतर उर्वरित ४० टक्के अनुदान वितरित केले जाते. पण समाज कल्याण विभागास शासनाकडूनच अनुदान मिळाले नसल्यामुळे यंदा दिवाळीपर्यंत पहिल्याच टप्प्यातील अनुदानापासून या वसतिगृहांना वंचित राहावे लागले. त्यामुळे इमारत भाडे, कर्मचाऱ्यांचे मानधन व विद्यार्थ्यांच्या भोजनाची गैरसोय झाली आहे.

या वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, ही अनेक वर्षांची मागणी आहे. यासंदर्भात वसतिगृह चालक संघटनांनी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला. पण, अद्याप ही मागणी मान्य झालेली नाही. अतिशय तुटपुंज्या मानधनात हे कर्मचारी विद्यार्थ्यांचे पालनपोषण करत आहेत. अनुदानाचा टप्पा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे मुलांना जेवण आणि इमारत भाड्याच्या समस्येलादेखील सामोरे जावे लागते, अशी खंत जिल्हा वसतिगृहचालक संघटनेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी व्यक्त केली.

सुट्यांमुळे अनुदान वाटपास विलंबयासंदर्भात समाज कल्याण विभागाचे निरीक्षक विजेंद्र डकले यांनी सांगितले की, शासनाकडून समाज कल्याण विभागाला अनुदान मिळण्यास यावेळी विलंब झाला. ऐन दिवाळीतच अनुसूचित जातीच्या मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांसाठी २ कोटी ३० लाख, तर भटके विमुक्त जमातीच्या वसतिगृहांसाठी १ कोटीचे अनुदान प्राप्त झाले. मात्र सुट्यांमुळे कोषागारे कार्यालय बंद होते. त्यामुळे बिले काढता आली नाहीत. आता लवकरच वसतिगृहांची बिले निकाली काढली जातील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र