शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत दररोज १२५ जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मितीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:02 IST

औरंगाबाद : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (सी.एम.आय.ए.) घाटी रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सोमवारी घाटी प्रशासनाकडे ...

औरंगाबाद : चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (सी.एम.आय.ए.) घाटी रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सोमवारी घाटी प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला. या प्रकल्पातून दररोज १२५ जम्बो सिलिंडर इतक्या ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याकडे घाटीचे पाऊल पडले आहे.

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या हस्तांतरप्रसंगी खा. इम्तियाज जलील, खा. भागवत कराड, आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत, उपाध्यक्ष शिवप्रसाद जाजू, सचिव सतीश लोणीकर, माजी अध्यक्ष राम भोगले, प्रसाद कोकीळ आदींची उपस्थिती होती. मेडिसीन विभागासमोरील जागेत हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यातून रोज १२५ जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होईल. यातून ६० खाटांना ऑक्सिजन पुरविणे शक्य होणार असल्याचे सतीश लोणीकर यांनी सांगितले.

प्रकल्पाच्या हस्तांतरणानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, लिक्विड ऑक्सिजनच्या बाबतीत घाटीत मोठी क्षमता आहे. ५३ हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता असून, ही क्षमता आणखी २० हजार लिटरने वाढणार आहे. जिल्हाभरातही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प केले जात आहेत. कोरोना काळात उद्योजकांनी मोठी मदत केली. सर्वांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद शहर लेव्हल-१ मध्ये आले. त्यामुळे शहरात सर्व काही खुले झाले. पण शिस्त पाळली नाही तर ही लेव्हल बिघडण्याचा धोका आहे. त्यामळे सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. खा. जलील म्हणाले, उद्योजकांनी जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. आ. चव्हाण म्हणाले, मनुष्यबळ कमी असतानाही घाटीतील कर्मचारी चांगले काम करीत आहेत. आ. शिरसाट म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही सुरु करण्याची गरज आहे.

कार्यक्रमास डाॅ. कैलास झिने, डाॅ. सुधीर चौधरी, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. ज्योती बजाज-इरावणे, डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. राजश्री साेनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एम. आय. सय्यद, अजय काळे आदी उपस्थित होते.

औरंगाबादेत ‘पीजीआय’ची मागणी

खा. भागवत कराड म्हणाले, चंडीगढप्रमाणे औरंगाबादेत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे औरंगाबादचे नाव वैद्यकीय दृष्टीने देशाच्या नकाशावर येईल. घाटीत सुविधा चांगल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने खबरदारी घेतली पाहिजे.