शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

मुद्रांक विभाग पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात; तुकडाबंदीचे उल्लंघन, दस्तनोंदणीच्या चौकशीची गरज

By विकास राऊत | Updated: March 4, 2024 12:13 IST

विभागातील अनेक कर्मचारी कोणत्या न कोणत्या कारणाने निलंबित होऊन पुन्हा सेवेत आले आहेत, तर काही कर्मचारी प्रभारी आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मुद्रांक विभाग दोन दिवसांपूर्वीच्या लाचखोरी प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी पवन परिहार याला लाच घेताना पकडले होते. त्यानंतर सिल्लोडचे दुय्यम निबंधक छगन पाटील हे सापळ्यात अडकले. लाचखोरीच्या प्रकरणांमुळे मुद्रांक विभागातील सगळी यंत्रणा पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

विभागातील अनेक कर्मचारी कोणत्या न कोणत्या कारणाने निलंबित होऊन पुन्हा सेवेत आले आहेत, तर काही कर्मचारी प्रभारी आहेत. तुकडाबंदीच्या नियमानुसार एनए प्रमाणपत्र असल्याशिवाय जमिनीचे तुकडे करून खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नाहीत. एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्यातील एक किंवा दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेतल्यास त्याची रजिस्ट्री होत नाही. परंतु त्या जमिनीत एक-दोन किंवा तीन गुंठे असे तुकडे पाडून जिल्हा प्रशासनाची ले-आऊट मंजुरी घेतल्यास रजिस्ट्री होते. परंतु मुद्रांक विभाग सगळ्या नियमांना डावलून रजिस्ट्री करीत असल्यामुळेच लाचखोरीची प्रकरणे होत असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात आहेत १३ कार्यालयेमुद्रांक विभागाची जिल्ह्यात १३ कार्यालये आहेत. या कार्यालयांतर्गत तुकडाबंदी नियम लागू झाल्यापासून आजवर झालेल्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी वारंवार झाली. परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. एखादे प्रकरण समोर आले तर निलंबनाची कारवाई होते. त्यानंतर पुन्हा तीन ते चार महिन्यांनी निलंबित कर्मचारी रुजू होतात.

तुकडाबंदी कायद्याची अंमलबजावणी कधीपासून?जिल्ह्यात आणि शहरात जुलै २०२१ पासून तुकडाबंदी कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकारी किंवा इतर प्राधिकरणाने जागेचा मंजूर केलेला ले-आऊट नसेल तर रजिस्ट्री करण्यात येऊ नये, असा हा कायदा सांगतो. परंतु मुद्रांक विभागाने सर्रासपणे या कायद्याचे उल्लंघन करून दस्तनोंदणी केली आहे. या कायद्याच्या विरोधात नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असले तरी मुद्रांक विभागात या कायद्याला फाटा देत रजिस्ट्रीचे व्यवहार होत असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यंतरी यासाठी चौकशीदेखील केली.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद