शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुद्रांक विभाग पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात; तुकडाबंदीचे उल्लंघन, दस्तनोंदणीच्या चौकशीची गरज

By विकास राऊत | Updated: March 4, 2024 12:13 IST

विभागातील अनेक कर्मचारी कोणत्या न कोणत्या कारणाने निलंबित होऊन पुन्हा सेवेत आले आहेत, तर काही कर्मचारी प्रभारी आहेत.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मुद्रांक विभाग दोन दिवसांपूर्वीच्या लाचखोरी प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी पवन परिहार याला लाच घेताना पकडले होते. त्यानंतर सिल्लोडचे दुय्यम निबंधक छगन पाटील हे सापळ्यात अडकले. लाचखोरीच्या प्रकरणांमुळे मुद्रांक विभागातील सगळी यंत्रणा पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

विभागातील अनेक कर्मचारी कोणत्या न कोणत्या कारणाने निलंबित होऊन पुन्हा सेवेत आले आहेत, तर काही कर्मचारी प्रभारी आहेत. तुकडाबंदीच्या नियमानुसार एनए प्रमाणपत्र असल्याशिवाय जमिनीचे तुकडे करून खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नाहीत. एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्यातील एक किंवा दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेतल्यास त्याची रजिस्ट्री होत नाही. परंतु त्या जमिनीत एक-दोन किंवा तीन गुंठे असे तुकडे पाडून जिल्हा प्रशासनाची ले-आऊट मंजुरी घेतल्यास रजिस्ट्री होते. परंतु मुद्रांक विभाग सगळ्या नियमांना डावलून रजिस्ट्री करीत असल्यामुळेच लाचखोरीची प्रकरणे होत असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात आहेत १३ कार्यालयेमुद्रांक विभागाची जिल्ह्यात १३ कार्यालये आहेत. या कार्यालयांतर्गत तुकडाबंदी नियम लागू झाल्यापासून आजवर झालेल्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी वारंवार झाली. परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. एखादे प्रकरण समोर आले तर निलंबनाची कारवाई होते. त्यानंतर पुन्हा तीन ते चार महिन्यांनी निलंबित कर्मचारी रुजू होतात.

तुकडाबंदी कायद्याची अंमलबजावणी कधीपासून?जिल्ह्यात आणि शहरात जुलै २०२१ पासून तुकडाबंदी कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकारी किंवा इतर प्राधिकरणाने जागेचा मंजूर केलेला ले-आऊट नसेल तर रजिस्ट्री करण्यात येऊ नये, असा हा कायदा सांगतो. परंतु मुद्रांक विभागाने सर्रासपणे या कायद्याचे उल्लंघन करून दस्तनोंदणी केली आहे. या कायद्याच्या विरोधात नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असले तरी मुद्रांक विभागात या कायद्याला फाटा देत रजिस्ट्रीचे व्यवहार होत असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यंतरी यासाठी चौकशीदेखील केली.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद