शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपा ‘स्थायी’च्या बैठकीत पाण्यासाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:15 IST

मनपा स्थायी समिती बैठकीत पाणीपुरवठ्यावरून सभापती गजानन बारवाल यांची एमआयएम आणि शिवसेना सदस्यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. बैठक तहकूब करून बारवाल यांनी दोन्ही पक्षांना शह देण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसभापतींची कोंडी : कार्यकारी अभियंत्यांच्या बदलीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनपा स्थायी समिती बैठकीत पाणीपुरवठ्यावरून सभापती गजानन बारवाल यांची एमआयएम आणि शिवसेना सदस्यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. बैठक तहकूब करून बारवाल यांनी दोन्ही पक्षांना शह देण्याचा प्रयत्न केला.जुन्या शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी लावून धरत ठिय्या दिला, तर कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांची पाणीपुरवठा विभागातून बदली करण्याची मागणी शिवसेनेने केली.बैठकीत एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी जुन्या शहराचा पाणी प्रश्नाचा मुद्दा पुढे आणला. ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून जुन्या शहराला समान पाणी देण्याची मागणी केली जात आहे; परंतु त्यावर निर्णय होत नाही.अनेक वेळा स्थायी समिती, सर्वसाधारण सभेने आदेश देऊनही पाणीपुरवठा विभागाने या भागाला शहरातील इतर वसाहतींप्रमाणे तीन दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केलेले नाही. दूषित पाण्याच्याही तक्रारी कायम आहेत. प्रशासनाला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश देण्याची मागणी करत सय्यद मतीन, अजीम खान यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांनी सभापतींच्या डायससमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. शिवसेना सदस्य राजू वैद्य यांनी एमआयएमच्या वक्तव्याची री ओढली. ते म्हणाले, पूर्ण शहरात पाणीपुरवठ्याच्या तक्रारी आहेत. पाणीपुरवठा विभाग कमी पडत आहे. चहल हे सक्षम अधिकारी नसून आजच्या आज त्यांचा पदभार काढून त्यांच्या जागी सक्षम अधिकारी द्यावा, नाही तर ही बैठक पुढे चालू न देण्याचा इशारा वैद्य यांनी दिला. सदस्य ऋषिकेश खैरे यांनीही चहल वारंवार फोन करूनही उत्तर देत नसल्याचा आरोप केला. सदस्या संगीता वाहुळे म्हणाल्या, पाण्यामुळे बैठकीत खाली बसण्याची वेळ आली. शिवसेनेचे आरोप आणि एमआयएमच्या ठिय्या आंदोलनामुळे गोंधळलेले सभापती बारवाल यांनी पंधरा मिनिटांसाठी बैठक तहकूब केली.दालनातील चर्चेत मनधरणीसभापती बारवाल यांनी बैठक तहकूब केल्यानंतर नगरसेवकांशी दालनात चर्चा करून मनधरणी केली. बैठक सुरू झाली तेव्हा चहल यांच्या बदलीवरून सर्वांनी यू-टर्न घेतला. राजू वैद्य, राजगौरव वानखेडे यांनी आयुक्तांशी चर्चा करून पाणी प्रश्नावर योग्य निर्णय घेण्याची मागणी केली. एमआयएमचे सदस्य म्हणाले, अधिकारी कोणताही असो. समान पाणीपुरवठा झाला पाहिजे. आयुक्तांना बैठकीत बोलावून जुन्या शहराला समान पाणी देण्याचे आदेश द्या, असे म्हणत एमआयएम सदस्यांनी पुन्हा ठिय्या दिला. त्यावर सभापतींनी आयुक्तांशी या मुद्यावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.