शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

हरिण- मोरांकडून कोवळे पीक फस्त

By admin | Updated: July 27, 2014 01:13 IST

औसा : तालुक्यात पावसाअभावी पेरण्या तब्बल महिनाभर उशिराने झाल्या़ परिणामी सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले़ त्यात ५० टक्के क्षेत्रावर बियाणे उगवले नाही़

औसा : तालुक्यात पावसाअभावी पेरण्या तब्बल महिनाभर उशिराने झाल्या़ परिणामी सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले़ त्यात ५० टक्के क्षेत्रावर बियाणे उगवले नाही़ जे बियाणे उगवले ते आता हरिण आणि मोर फस्त करीत आहेत़ वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाले आहेत़औसा तालुका हा पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे़ तालुक्यात सिंचन क्षेत्र ही अगदी कमी आहे़ गेल्या चार- पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बागायती क्षेत्र मोडकळीस आले आहे़यंदाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला़ त्यातच खरीप हंगामात काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनची उगवण झाली नाही़ ज्या शेतकऱ्यांचे पीक उगवले आहे़ त्यावर हरिण, मोर ताव मारीत आहेत़ त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे़ पेरण्या झाल्यानंतर मोठा पाऊसच न झाल्यामुळे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात उगवण झालेल्या कोवळ्या पिकांची नासधूस करीत आहेत़गेल्या काही वर्षांत तालुक्यात हरणांची संख्या वाढली आहे़ तालुक्यात जवळपास आठ ते दहा हजार हरणांची संख्या आहे़ हरिण हा माळरानावर राहणारा प्राणी आहे़ पण आता मात्र कुठेही हरणांचे कळप दिसू लागले आहेत़ एका कळपात २० ते २५ हरिण असतात़ एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात हरिण घुसले की त्याचे उगवलेले सोयाबीन फस्त करीत आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना उगवलेल्या सोयाबीनची राखण करावी लागत आहे़ तालुक्यातील नागरसोगा, दापेगाव, तुंगी, चिंचोली, भादा, हासेगाव, गोद्री, लामजना, उत्का, दावतपूर या गावांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत़(वार्ताहर)दिवसरात्र पिकांची राखण़़़हरणांनी एकदा सोयाबीनचा उगवण झालेला शेंडा खाल्ला की पुन्हा फुटत नाही़ त्यामुळे रात्रं-दिवस राखण करावी लागत असल्याचे नागनाथ शिंदे, जगदीश मिश्रा, संजय सूर्यवंशी, हणमंत काकडे, दत्तू पांचाळ या शेतकऱ्यांनी सांगून दिवस-रात्र राखण करावी लागत असल्याचे म्हणाले़