शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

एस.टी.ची चाके रुतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:17 IST

बीड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत एकही बस स्थानकातून बाहेर पडली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वेतनवाढीच्या मुख्य मागणीसाठी राज्यभर सर्वत्र कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात हा संप पुकारल्यामुळे खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. हा सण म्हणजे प्रवाशांसाठी शिमगा, तर खाजगी वाहनधारकांसाठी दिवाळी ठरला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत एकही बस स्थानकातून बाहेर पडली नव्हती. जिल्ह्यात १०० टक्के संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनांनी केला आहे.१ एप्रिल २०१६ पासून एस.टी. कर्मचा-यांना राज्यातील शासकीय कर्मचाºयांप्रमाणे मिळणा-या वेतनश्रेणी, वेतन, विविध भत्ते, सेवा-सवलतींसह सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय सातवा वेतन आयोग लागू करावा, वाढीव ७ टक्के महागाई भत्ता, तसेच जानेवारी २०१७ पासून वाढीव ४ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ अदा करावी, यासारख्या २४ विविध मागण्यांसाठी एस.टी. कर्मचा-यांनी राज्यभर संप पुकारला आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची बैठक झाली; परंतु त्यांच्याकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री राज्यातील एकाही स्थानकातून बस बाहेर पडली नाही.बीड जिल्ह्यातील ८ आगारांच्या जवळपास १८ स्थानकांमधून बस बाहेर पडली नाही.अनेकांना हा संप माहीत नसल्यामुळे ते नेहमीप्रमाणे स्थानकात येत होते. येथे आल्यानंतर त्यांना संपाबाबत माहिती मिळताच खाजगी वाहनांकडे धाव घेतली.मंगळवारी दिवसभर जिल्हाभरात खाजगी वाहनधारकांची ‘दिवाळी’ जोरात साजरी झाली, तर जादा तिकीटदर आकारला जात असल्याने प्रवाशांवर ‘शिमगा’ करण्याची वेळ आली.