शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:02 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक सुरक्षित असतो. पण वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रवाशांकडून ट्र्रॅव्हल्सला पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात एसटी चालक व वाहक अधिक प्रमाणात बाधित झाले होते. त्यामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करून एसटी प्रवास बंद करण्यात आला होता. त्यातही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी ऑनलाइन अर्ज टाकून परवानगी मिळाल्यानंतरच प्रवास करता येत होता. परंतु त्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. आदळआपट, खडखड टाळण्यासाठी सुरक्षित प्रवास करण्याकरिता प्रवाशांनी खाजगी वाहनांना अधिक पसंती दिलेली आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित असला तरी प्रवासी खाजगी प्रवासी वाहनांनी ओढलेले आहेत. प्रवाशांना लागणाऱ्या सेवा-सुविधा खाजगी प्रवासी वाहनांमध्ये पुरविलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी आराम गाडीत आराम करीत जातात. प्रवासातून आल्यावर खूप थकल्यासारखे वाटू नये म्हणून खबरदारी घेतलेली असते.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल सुसाट...

अपघाताच्या घटना घडामोडी होऊ नये म्हणून एसटी बसला स्पीड लॉक केले जाते. त्यामुळे एसटीच्या प्रवासातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होतो. खाजगी प्रवासी बसला सुसाट वेग असतो त्यामुळे प्रवासी ठरलेल्या वेळेत पुणे, मुंबईमध्ये पोहोचतो. खाजगी बसला मात्र लाॅक लावलेले नसते.

आराम महत्त्वाचा की, सुरक्षित प्रवास....

- नोकरदारांना गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते. तेव्हा खाजगी बसेसने प्रवास सोयीचा ठरतो. अनेकदा उशिरा पोहोचल्यामुळे कामाला सुट्टी मारावी लागते.

- अनिल भालेराव (प्रवासी)

- सामान्य नागरिकांना कोरोनामुळे प्रवास करण्यासाठी आजही भीती वाटते. परंतु नोकरी व शैक्षणिक कारणासाठी प्रवास हा गरजेचा आहे. महत्त्वाची कामे असल्यामुळे प्रवासात जास्त बसेस बदलण्याची गरज पडत आहे म्हणून खाजगी बसने प्रवास करतो.

- अशोक गडवे (प्रवासी)

सर्वांनाच सुरक्षित एसटी आवडते...

खाजगी बससेवेची वाहतूक होत असली तरी सुरक्षित प्रवास म्हणून आजही लोक एसटी लाच प्राधान्य देतात. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वेगमर्यादा असल्यामुळे वाहतूक सुरक्षित असते.

- अमोल आहिरे, एसटीचे विभागीय अधिकारी