शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:02 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक सुरक्षित असतो. पण वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रवाशांकडून ट्र्रॅव्हल्सला पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात एसटी चालक व वाहक अधिक प्रमाणात बाधित झाले होते. त्यामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करून एसटी प्रवास बंद करण्यात आला होता. त्यातही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी ऑनलाइन अर्ज टाकून परवानगी मिळाल्यानंतरच प्रवास करता येत होता. परंतु त्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. आदळआपट, खडखड टाळण्यासाठी सुरक्षित प्रवास करण्याकरिता प्रवाशांनी खाजगी वाहनांना अधिक पसंती दिलेली आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित असला तरी प्रवासी खाजगी प्रवासी वाहनांनी ओढलेले आहेत. प्रवाशांना लागणाऱ्या सेवा-सुविधा खाजगी प्रवासी वाहनांमध्ये पुरविलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी आराम गाडीत आराम करीत जातात. प्रवासातून आल्यावर खूप थकल्यासारखे वाटू नये म्हणून खबरदारी घेतलेली असते.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल सुसाट...

अपघाताच्या घटना घडामोडी होऊ नये म्हणून एसटी बसला स्पीड लॉक केले जाते. त्यामुळे एसटीच्या प्रवासातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होतो. खाजगी प्रवासी बसला सुसाट वेग असतो त्यामुळे प्रवासी ठरलेल्या वेळेत पुणे, मुंबईमध्ये पोहोचतो. खाजगी बसला मात्र लाॅक लावलेले नसते.

आराम महत्त्वाचा की, सुरक्षित प्रवास....

- नोकरदारांना गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते. तेव्हा खाजगी बसेसने प्रवास सोयीचा ठरतो. अनेकदा उशिरा पोहोचल्यामुळे कामाला सुट्टी मारावी लागते.

- अनिल भालेराव (प्रवासी)

- सामान्य नागरिकांना कोरोनामुळे प्रवास करण्यासाठी आजही भीती वाटते. परंतु नोकरी व शैक्षणिक कारणासाठी प्रवास हा गरजेचा आहे. महत्त्वाची कामे असल्यामुळे प्रवासात जास्त बसेस बदलण्याची गरज पडत आहे म्हणून खाजगी बसने प्रवास करतो.

- अशोक गडवे (प्रवासी)

सर्वांनाच सुरक्षित एसटी आवडते...

खाजगी बससेवेची वाहतूक होत असली तरी सुरक्षित प्रवास म्हणून आजही लोक एसटी लाच प्राधान्य देतात. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वेगमर्यादा असल्यामुळे वाहतूक सुरक्षित असते.

- अमोल आहिरे, एसटीचे विभागीय अधिकारी