शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्र्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:02 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : प्रवासादरम्यान अधिकची दगदग आणि अनेक स्टॉपवर थांबल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. एसटीचा प्रवास ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक सुरक्षित असतो. पण वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रवाशांकडून ट्र्रॅव्हल्सला पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात एसटी चालक व वाहक अधिक प्रमाणात बाधित झाले होते. त्यामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधांचे पालन करून एसटी प्रवास बंद करण्यात आला होता. त्यातही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी ऑनलाइन अर्ज टाकून परवानगी मिळाल्यानंतरच प्रवास करता येत होता. परंतु त्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. आदळआपट, खडखड टाळण्यासाठी सुरक्षित प्रवास करण्याकरिता प्रवाशांनी खाजगी वाहनांना अधिक पसंती दिलेली आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित असला तरी प्रवासी खाजगी प्रवासी वाहनांनी ओढलेले आहेत. प्रवाशांना लागणाऱ्या सेवा-सुविधा खाजगी प्रवासी वाहनांमध्ये पुरविलेल्या आहेत. त्यामुळे प्रवासी आराम गाडीत आराम करीत जातात. प्रवासातून आल्यावर खूप थकल्यासारखे वाटू नये म्हणून खबरदारी घेतलेली असते.

एसटीला स्पीड लॉक, ट्रॅव्हल सुसाट...

अपघाताच्या घटना घडामोडी होऊ नये म्हणून एसटी बसला स्पीड लॉक केले जाते. त्यामुळे एसटीच्या प्रवासातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होतो. खाजगी प्रवासी बसला सुसाट वेग असतो त्यामुळे प्रवासी ठरलेल्या वेळेत पुणे, मुंबईमध्ये पोहोचतो. खाजगी बसला मात्र लाॅक लावलेले नसते.

आराम महत्त्वाचा की, सुरक्षित प्रवास....

- नोकरदारांना गैरसोय होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागते. तेव्हा खाजगी बसेसने प्रवास सोयीचा ठरतो. अनेकदा उशिरा पोहोचल्यामुळे कामाला सुट्टी मारावी लागते.

- अनिल भालेराव (प्रवासी)

- सामान्य नागरिकांना कोरोनामुळे प्रवास करण्यासाठी आजही भीती वाटते. परंतु नोकरी व शैक्षणिक कारणासाठी प्रवास हा गरजेचा आहे. महत्त्वाची कामे असल्यामुळे प्रवासात जास्त बसेस बदलण्याची गरज पडत आहे म्हणून खाजगी बसने प्रवास करतो.

- अशोक गडवे (प्रवासी)

सर्वांनाच सुरक्षित एसटी आवडते...

खाजगी बससेवेची वाहतूक होत असली तरी सुरक्षित प्रवास म्हणून आजही लोक एसटी लाच प्राधान्य देतात. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वेगमर्यादा असल्यामुळे वाहतूक सुरक्षित असते.

- अमोल आहिरे, एसटीचे विभागीय अधिकारी