शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2020 : औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९२ टक्के; विभागात दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 20:02 IST

तब्बल १९ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी पटकावली.

ठळक मुद्देमुलींची आघाडी कायममुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७२ मुलींची ९५.१ टक्के

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक  शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के लागला आहे. विभागात औरंगाबाद  जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे, तर प्रथम क्रमांक जालना जिल्ह्याने पटकावला आहे. जिल्ह्याच्या निकालात मुलींची आघाडी कायम आहे.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल विभागीय सचिवांनी बुधवारी दुपारी जाहीर केला. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार ८७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६४ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ५९ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१० एवढी आहे.  जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या ६४ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ५११ मुले आणि २९ हजार ११७ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३१ हजार ८६० मुले, तर २७ हजार ६६३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.  मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७२ आहे, तर मुलींची ९५.१ एवढी आहे. मुलांच्या तुलनेत ५.२९ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. पुनर्परीक्षार्थींमध्ये  ४ हजार ८७९ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  ही टक्केवारी ६८.८३ एवढी आहे.

१९००० हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्णऔरंगाबाद जिल्ह्यात एकूण ५९ हजार ५२३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १९ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी पटकावली. २१ हजार ३११  विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीत १४ हजार ६०९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद  विभागात ५२ हजार ७७७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी मिळविली आहे.

कमी नव्हे, खरा निकाल लागला औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल कमी लागला असेल; पण तो खरा निकाल आहे. खोट्या निकालाची विद्यार्थ्यांना गरज नाही. परीक्षेत गैरप्रकार करून निकाल वाढवला जात होता. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात राबविलेल्या कॉपीमुक्त मोहिमेमुळे निकाल कमी लागला असेल; पण विद्यार्थ्यांची ही खरी गुणवत्ता आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात खऱ्या निकालाची आवश्यकता आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमिकचे शिक्षणाधिकारी  डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र