शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

SSC Result 2020 : औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९२ टक्के; विभागात दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 20:02 IST

तब्बल १९ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी पटकावली.

ठळक मुद्देमुलींची आघाडी कायममुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७२ मुलींची ९५.१ टक्के

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक  शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९२.१० टक्के लागला आहे. विभागात औरंगाबाद  जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे, तर प्रथम क्रमांक जालना जिल्ह्याने पटकावला आहे. जिल्ह्याच्या निकालात मुलींची आघाडी कायम आहे.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल विभागीय सचिवांनी बुधवारी दुपारी जाहीर केला. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार ८७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ६४ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ५९ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.१० एवढी आहे.  जिल्ह्यात परीक्षा दिलेल्या ६४ हजार ६२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३५ हजार ५११ मुले आणि २९ हजार ११७ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३१ हजार ८६० मुले, तर २७ हजार ६६३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.  मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७२ आहे, तर मुलींची ९५.१ एवढी आहे. मुलांच्या तुलनेत ५.२९ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत. पुनर्परीक्षार्थींमध्ये  ४ हजार ८७९ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  ही टक्केवारी ६८.८३ एवढी आहे.

१९००० हजार विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्णऔरंगाबाद जिल्ह्यात एकूण ५९ हजार ५२३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १९ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत प्रावीण्य श्रेणी पटकावली. २१ हजार ३११  विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीत १४ हजार ६०९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ३ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद  विभागात ५२ हजार ७७७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी मिळविली आहे.

कमी नव्हे, खरा निकाल लागला औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल कमी लागला असेल; पण तो खरा निकाल आहे. खोट्या निकालाची विद्यार्थ्यांना गरज नाही. परीक्षेत गैरप्रकार करून निकाल वाढवला जात होता. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात राबविलेल्या कॉपीमुक्त मोहिमेमुळे निकाल कमी लागला असेल; पण विद्यार्थ्यांची ही खरी गुणवत्ता आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात खऱ्या निकालाची आवश्यकता आहे. त्यात औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमिकचे शिक्षणाधिकारी  डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र