शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

क्रीडा कार्यालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’!

By admin | Updated: January 14, 2015 00:58 IST

सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलात तालुकापासून ते राज्यस्तरापर्यंतच्या स्पर्धा होतात, मात्र बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना येथे कसल्याच सोयी-सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे़

सोमनाथ खताळ , बीडयेथील जिल्हा क्रीडा संकुलात तालुकापासून ते राज्यस्तरापर्यंतच्या स्पर्धा होतात, मात्र बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना येथे कसल्याच सोयी-सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे़ हे कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशाच स्थितीत असल्याचे दिसून येत आहे़जिल्हा कार्यालय सुसज्ज व स्वच्छ असावे़ मात्र येथील जिल्हा क्रीडा कार्यालय याला अपवाद आहे़ या क्रीडा कार्यालयाच्या परीसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य तर पसरलेलेच आहे, शिवाय येथे येणाऱ्या खेळाडूंना योग्य त्या सोयी-सुविधाही मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे़खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंना राहण्यासाठी क्रीडा कार्यालयात तीन मजली इमारत आहे़ यामध्ये पहिल्या मजल्यात कार्यालय आहे तर दुसऱ्या व तीसऱ्या मजल्यावरील १२ हॉलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते़ मात्र प्रत्यक्षात या खेळाडूंना राहण्यासाठी ना योग्य रूम आहेत, ना लाईट़ स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झाली असून त्यांना इतर सोयी सुविधाही मिळत नसल्याने येणाऱ्या खेळाडूंमधून नाराजीचा सुर उगवत आहे़विशेष म्हणजे या कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता, याची चौकशीही झाली होती, आणि यामध्ये त्या दोषी आढळल्या होत्या़ मात्र कसलीच कारवाई त्यांच्यावर झालेली नाही़ अशा या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच खेळाडूंना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत आहे़ या कार्यालयात तीन क्रीडा अधिकारी आहेत, मात्र तीनपैकी एक क्रीडा अधिकारी केवळ दोनच दिवस काम करून पसार झाला तर दुसऱ्या क्रीडा अधिकारी आजारी रजेवर गेलेल्या आहेत, त्यामुळे या कार्यालयाचे नियोजन पुर्णत: ढासळले आहे़ याचा त्रास खेळाडूंना सहन करावा लागत आहे़राज्यस्तरीय स्पर्धा असतील तर त्यामध्ये सहा विभाग येतात, आणि या सहा विभागातील खेळाडुंसाठी सहा हॉल असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले़ मात्र या खेळाडूंना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व इतर सुविधा दिल्या जातात का? असे विचारले असता, त्यांना उत्तर देता आले नाही़याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसुळ यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वणी नॉटरिचेबल होता़