शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

नारळी सप्ताहातून सामाजिक सलोख्याला अध्यात्माची जोड !

By admin | Updated: April 8, 2015 00:53 IST

प्रताप नलावडे , बीड अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी

प्रताप नलावडे , बीडअध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द या छोट्याशा गावात हा सप्ताह सुरू आहे. दररोज एक लाखापेक्षा भाविक या सप्ताहात हजेरी लावत असून ९ एप्रिलला या सप्ताहाच्या समारोपासाठी तीन लाखापेक्षाही अधिक भाविक हिंगणी खुर्दमध्ये दाखल होणार आहेत.सामाजिक सलोखा राखणे आणि अध्यात्माच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम या सप्ताहातून होत असल्याचे न्यायचार्य नामदेव महाराज शास्त्री आवर्जून सांगतात. संत भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या या नारळी सप्ताहाची व्याप्ती आता इतकी वाढली आहे की यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची संख्या लाखावर पोहोचली आहे. सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन हा सप्ताह गेली ८२ वर्षापासून करत आहेत. भगवान गडावरून सप्ताहाच्या आयोजनासाठी नारळ घ्यायचा आणि त्यानंतर त्याची तयारी करायची, अशी परंपरा चालत आली आहे. गेली नऊ वर्षापूर्वी हिंगणी खुर्द गावाला हा मानाचा नारळ मिळाला होता. तेव्हापासून गावकरी सप्ताहाच्या आयोजनाच्या तयारीत गुंतले आहेत. यासाठी वर्गणी गोळा करतानाही शेतकऱ्यानी आपल्या शेतीशी याचा मेळ घातला. एका एकरासाठी तीन हजार रूपये वर्गणी स्वखुशीने गावकऱ्यांनी दिली. नऊ वर्षात चाळीस लाखापेक्षाही अधिक रक्कम जमा करण्यात आली. यातूनच हा खर्च भागविला जातो.काही लोकांनी वस्तूच्या स्वरूपात मदत केली आहे. संभाजी चव्हाण यांनी २५ किंव्टल साखर, राजेंद्र मुंडे यांनी ५१ किंव्टल गहु, अशोक लोढा यांनी तेलाचे डबे असे जमेल तसे प्रत्येकाने या सप्ताहाचा भार उचलला आहे. रक्कम कमी पडली तर भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य नामदेव महाराज स्वत: खर्च करतात.दररोज भजन, कीर्तन, रामकथा, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. स्वत: नामदेव महाराज शास्त्री जातीने सर्व व्यवस्थेवर लक्ष देतात. हिंगणी हे अवघ्या दोन हजार लोकसंख्येचे गाव. या गावाला सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. गावाकडे जाणाऱ्या छोट्याशा कच्च्या रस्त्यावर मोटार गाड्यांची रांग लागली आहे. २५ एकराच्या परिसरात सप्ताह साजरा केला जात आहे. १० एकर परिसरात मंडपाची उभारणी केली असून कार्यक्रमासाठी, भोजनासाठी आणि स्वयपाकासाठी वेगवेगळे विभाग केले आहेत.संपूर्ण गावातील लोक नियोजनात सहभागी तर झाले आहेतच, परंतु बाहेर गावावरून आलेल्या लोकांचीही लगबग सुरू आहे.