शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

नारळी सप्ताहातून सामाजिक सलोख्याला अध्यात्माची जोड !

By admin | Updated: April 8, 2015 00:53 IST

प्रताप नलावडे , बीड अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी

प्रताप नलावडे , बीडअध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द या छोट्याशा गावात हा सप्ताह सुरू आहे. दररोज एक लाखापेक्षा भाविक या सप्ताहात हजेरी लावत असून ९ एप्रिलला या सप्ताहाच्या समारोपासाठी तीन लाखापेक्षाही अधिक भाविक हिंगणी खुर्दमध्ये दाखल होणार आहेत.सामाजिक सलोखा राखणे आणि अध्यात्माच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम या सप्ताहातून होत असल्याचे न्यायचार्य नामदेव महाराज शास्त्री आवर्जून सांगतात. संत भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या या नारळी सप्ताहाची व्याप्ती आता इतकी वाढली आहे की यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची संख्या लाखावर पोहोचली आहे. सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन हा सप्ताह गेली ८२ वर्षापासून करत आहेत. भगवान गडावरून सप्ताहाच्या आयोजनासाठी नारळ घ्यायचा आणि त्यानंतर त्याची तयारी करायची, अशी परंपरा चालत आली आहे. गेली नऊ वर्षापूर्वी हिंगणी खुर्द गावाला हा मानाचा नारळ मिळाला होता. तेव्हापासून गावकरी सप्ताहाच्या आयोजनाच्या तयारीत गुंतले आहेत. यासाठी वर्गणी गोळा करतानाही शेतकऱ्यानी आपल्या शेतीशी याचा मेळ घातला. एका एकरासाठी तीन हजार रूपये वर्गणी स्वखुशीने गावकऱ्यांनी दिली. नऊ वर्षात चाळीस लाखापेक्षाही अधिक रक्कम जमा करण्यात आली. यातूनच हा खर्च भागविला जातो.काही लोकांनी वस्तूच्या स्वरूपात मदत केली आहे. संभाजी चव्हाण यांनी २५ किंव्टल साखर, राजेंद्र मुंडे यांनी ५१ किंव्टल गहु, अशोक लोढा यांनी तेलाचे डबे असे जमेल तसे प्रत्येकाने या सप्ताहाचा भार उचलला आहे. रक्कम कमी पडली तर भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य नामदेव महाराज स्वत: खर्च करतात.दररोज भजन, कीर्तन, रामकथा, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. स्वत: नामदेव महाराज शास्त्री जातीने सर्व व्यवस्थेवर लक्ष देतात. हिंगणी हे अवघ्या दोन हजार लोकसंख्येचे गाव. या गावाला सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. गावाकडे जाणाऱ्या छोट्याशा कच्च्या रस्त्यावर मोटार गाड्यांची रांग लागली आहे. २५ एकराच्या परिसरात सप्ताह साजरा केला जात आहे. १० एकर परिसरात मंडपाची उभारणी केली असून कार्यक्रमासाठी, भोजनासाठी आणि स्वयपाकासाठी वेगवेगळे विभाग केले आहेत.संपूर्ण गावातील लोक नियोजनात सहभागी तर झाले आहेतच, परंतु बाहेर गावावरून आलेल्या लोकांचीही लगबग सुरू आहे.