शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

१५ कोटी ६९ लाखांचा निधी वेळेत खर्च करा

By admin | Updated: April 18, 2016 00:44 IST

नांदेड : ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्ह्याला मार्च २०१६ अखेर १५ कोटी ६९ लाख ७७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला़

नांदेड : ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणासाठी जिल्ह्याला मार्च २०१६ अखेर १५ कोटी ६९ लाख ७७ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला़ हा निधी यापूर्वीच जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी या निधीचा वेळेत व योग्य पद्धतीने विनियोग होण्यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले आहेत़ जिल्हाधिकारी काकाणी यांनी सांगितले, निधीच्या खर्चाबाबतची विवरण पत्रे व वेळोवेळीचा अहवालही सादर करण्याच्या, त्याबाबत विहित पद्धतीचे काटेकोर पालन व्हावे, असेही सूचित करण्यात आले आहे़ जिल्ह्यात मार्च २०१६ अखेर प्राप्त झालेला हा निधी तातडीने जिल्हा परिषदेच्या वेळेत यंत्रणांकडे वितरीत करण्यात आला़ यापुढेही निधी- अभावी पाणीटंचाई निवारणाचे कोणतेही काम प्रलंबित राहू नये, असे प्रयत्न आहेत़ ज्या टप्प्यावर टंचाई निवारण उपाययोजनांसाठी प्रस्ताव येत जातील त्यांची पडताळणी करून मागणीप्रमाणे अशा कामांनाही पुढे वेळेत निधी मिळेल, याची दक्षता घेतली जात आहे़ जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी व त्यासाठीच्या उपाययोजनासाठी वेळेत निधीची मागणी करण्यात आली होती़ त्यानुसार विभागीय आयुक्तालयाने २१ मार्च २०१६ च्या आदेशान्वये पहिल्य टप्प्यात ६ कोटी २९ लाख ९५ हजार रूपयांचा निधी जिल्ह्याला वितरित केला़ त्यामध्ये विंधन विहिरींची विशेष दुरूस्तीसाठी २९ लाख ६० हजार रूपये, टँकरच्या इंधनासाठी ३ कोटी ९७ लाख ४५ हजार रूपये, तसेच विहीर अधिग्रहणासाठी २ कोटी २ लाख ९० हजार रूपये यानुसार उपाययोजनांकरिता निधी प्राप्त झाला होता़ त्यानंतर ३१ मार्च २०१६ च्या दुसऱ्या आदेशान्वये टँकरच्या इंधनसाठी ६ कोटी ६० लाख रूपये आणि विहिर अधिग्रहणासाठी २ कोटी ८९ लाख ८२ हजार रूपये असा एकूण ९ कोटी ३९ लाख ८२ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ (प्रतिनिधी)