शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

ट्रान्सफॉर्मर देण्याचा वेग तिपटीने वाढला

By admin | Updated: November 2, 2014 00:22 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. शेतकरी आणि गावकरी डी.पी. मिळविण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात खेट्या मारीत आहेत. याविषयी लोकमतने, हॅलो औरंगाबादमध्ये १ नोव्हेंबरच्या अंकात ‘बंद ट्रान्सफॉर्मरचा शॉक’ या मथळ्याखाली बातमी आणि शॉक हे विशेष पान प्रकाशित केले होते. त्याचा परिणाम शनिवारी महावितरणच्या कारभारावर होताना दिसून आला. वीज ग्राहकांना ट्रान्सफॉर्मर देण्याचा मंदावलेला वेग चक्क तिपटीने वाढला.जिल्ह्यातील औरंगाबाद आणि कन्नड विभागात १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीज ग्राहकांना १४ ट्रान्सफॉर्मर वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात सध्या शेकडो ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. महावितरणच्या दोन्ही विभागांमध्ये बंद डीपींचा खच पडला आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा करण्यास महावितरण कमी पडत आहे. विशेष म्हणजे ट्रान्सफॉर्मर जमा केल्यानंतर एक ते दीड महिना मिळत नाही. सिंगल फेज आणि थ्री फेजचे ट्रान्सफॉर्मर मिळण्यासाठी वीज ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.महावितरणकडून रोज चार ते पाच ट्रान्सफॉर्मर ग्राहकांना देण्यात येते होते; पण शनिवारी कन्नड विभागातातून ६३ केव्ही- ३ ट्रान्सफॉर्मर, १०० केव्ही- ३, औरंगाबाद विभागातून ६३ के.व्ही.- ५, १०० केव्ही- ३, असे १४ ट्रान्सफॉर्मर वितरित करण्यात आले. ही माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता ए.एन. सोनवणे यांनी दिली.स्पष्टीकरण आणि आवाहनगेल्या काही दिवसांत ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये डीपी दुरुस्त करणारे विविध कंपन्यांचे कर्मचारी निवडणूक आणि दिवाळीमुळे सुटीवर गेले होते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नव्हता. परिणामी, तफावत निर्माण झाली होती. आजपासून सर्व कामकाज पूर्ववत होत आहे. चार-पाच दिवसांत डीपीचा प्रश्न मार्गी लागेल, असे स्पष्टीकरण अधीक्षक अभियंता ए.एन. सोनवणे यांनी दिले.डीपीवर विजेचा अतिरिक्त दाब वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर बंद पडतात. दाब वाढू नये यासाठी ग्राहकांनी आकडे टाकून वीजचोरी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.