शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

जिल्ह्यात १ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:38 IST

यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना अनेक शेतक-यांना जीव गमवावा लागला. ही घटना जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अशी अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून कृषी विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना अनेक शेतक-यांना जीव गमवावा लागला. ही घटना जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अशी अनुचित घटना घडू नये, यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करून कृषी विभागाने शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी केले आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने १३ आॅक्टोबर रोजी कृषी विभागाचे क्षेत्रिय अधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच सर्व कीटकनाशके व बियाणे विक्रेत्यांची कार्यशाळा घेतली.या कार्यशाळेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कीटकनाशके हाताळावी कशी किंवा त्यांची फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, या विषयी ग्रामसभेच्या माध्यमातूून शेतक-यांचे प्रबोधन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या होत्या.त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले आहे. ग्रामसभेत याशिवाय कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे नियंत्रण, शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेबद्दल शेतक-यांना माहिती दिली जाणार आहे.ग्रामसभांसाठी निरीक्षक म्हणून शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सर्व विभागांचे विस्तार अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांची देखील या ग्रामसभांना उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेत पंचायत समित्यांमधील कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, राज्य शासनाच्या कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक आदी शेतक-यांना माहिती देणार आहेत.