शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरद्वारे वाढली पेरणी

By admin | Updated: July 15, 2014 00:51 IST

रमेश शिंदे, औसा यंदाच्या हंगामात पाऊस उशिरा झाला. हा पाऊस सर्वत्र समान पडला नाही. कुठे कमी तर कुठे बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. रोहिण्या, मृग, आर्द्रा ही तीनही नक्षत्रे कोरडी गेली.

रमेश शिंदे, औसायंदाच्या हंगामात पाऊस उशिरा झाला. हा पाऊस सर्वत्र समान पडला नाही. कुठे कमी तर कुठे बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. रोहिण्या, मृग, आर्द्रा ही तीनही नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे पेरण्यांना तब्बल महिनाभर उशीर झाला. पेरण्या लांबल्यामुळे आता शेतकऱ्यांची पेरण्यासाठी लगबग सुरू आहे. पेरण्यांना विलंब होत असल्यामुळे आता बैलबारदाना असलेले शेतकरीही ट्रॅक्टरद्वारे पेरण्या करताना दिसत आहेत. औसा तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून पेरण्यांनी वेग घेतला असून, जवळपास ६० ते ७० टक्के पेरण्या उरकल्या आहेत.औसा तालुक्यात ८५ हजार ते १ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरण्या होतात. पण यावर्षी खरीप हंगामाच्याा पेरण्यासाठीचा पाऊसच तब्बल महिनाभर उशिराने पडला. प्रत्येकवर्षी मृग, आर्द्रात पेरण्या होतात. पण या दोन्ही नक्षत्रांनी यावर्षी शेतकऱ्यांना चांगलाच दगा दिला आहे. पुनर्वसू नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी आता पेरण्यात व्यस्त झाला आहे. मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या या तालुक्यात बैलबारदाना मोठ्या प्रमाणात मोडीत काढला आहे. ज्यांच्याकडे बैलबारदाना नाही, असे शेतकरी तर ट्रॅक्टराद्वारेच पेरणी उरकत आहेत. पण आता पेरण्या विलंबाने होत असल्यामुळे बैलबारदाना असलेले शेतकरीही पेरण्यांसाठी ट्रॅक्टरच्या मागे धावत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असल्यामुळे आणि शेती हाच मुख्य व्यवसाय असल्यामुळे बैलांची संख्याही बऱ्यापैकी आहे. जवळपास ६३ हजार इतके बैल तालुक्याात आहेत. ज्यांच्याकडे बैल आहेत आणि कमी प्रमाणात जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून, त्या अखेरच्या टप्प्यात आहेत. बैलावरील पेरणीही मंदगतीने होते. तर ट्रॅक्टरवरील पेरणी जलदगतीने होते. त्यामुळे सर्रास ट्रॅक्टरवर पेरणी होत आहे. औसा तालुक्यात सध्या १२५ ते १५० पेरणी यंत्र पेरण्या उरकत आहेत.ट्रॅक्टरचालक वजीर पटेल म्हणाले की, ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्रात खत आणि बियाणे एकदाच भरता येते. पेरणी करण्यासाठी माणसांची आवश्यकता नाही. आपल्याला बी जसे सोडायचे तसे ती सोडण्याची व्यवस्था आहे. नियामक बी व खत पेरणी होत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरला पसंती देत आहेत, असे सांगितले.ओमप्रकाश सूर्यवंशी हे शेतकरी म्हणाले की, ३० एकर जमीन आहे. बैलावर दररोज दोन ते तीन एकर जमीन पेरणी होते. सर्व जमीन पेरणी होण्यास आठ ते दहा दिवस लागतात. त्यामुळे ट्रॅक्टरवर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरवर दिवसभरात सात ते दहा एकर पेरणी होते. आधीच पेरण्यास उशीर झाला. पुन्हा पेरण्यांना उशीर नको म्हणून ट्रॅक्टरवर पेरणी केली. पैसे गेले तर कामही वेळेवर होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी एकरी ६०० ते ८०० रुपये घेतले जातात. दिवसभराच्या कालावधीत जवळपास १२ ते १५ एकर क्षेत्रावर पेरणी होते. बैलाद्वारे होणाऱ्या पेरणीपेक्षा या पेरणीचा वेग जास्त असल्याने शेतकऱ्यांचा कलही वाढला असल्याचे ट्रॅक्टर मालक अजित फावडे यांनी सांगितले.पावसाने विलंब केल्याने शेतकरी सध्या लवकर पेरण्या उरकण्यासाठी धावपळ करीत आहेत. चार पैसे जास्त गेले तरी हरकत नाही. परंतु, वेळेत पेरणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे बैलबारदाना असणारे शेतकरीही ट्रॅक्टरचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.