शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

रिमझिम पावसातही पेरणीची सरासरी पार !

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

दिनेश गुळवे , बीड गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भागात झालेला पाऊस व तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडत असलेला रिमझिम पाऊस यामुळे जिल्ह्यात आता खरीपाच्या पेरणीने सरासरी ओलांडली आहे.

दिनेश गुळवे , बीडगेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भागात झालेला पाऊस व तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडत असलेला रिमझिम पाऊस यामुळे जिल्ह्यात आता खरीपाच्या पेरणीने सरासरी ओलांडली आहे. धान्य तर पेरले आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी पाऊसाने हुलकावणी दिली आहे. अजुनही जिल्ह्यात केवळ ११० ते १३० मि.मी. पाऊस पडलेला आहे. पावसाची ही सरासरी अत्यंत अल्प आहे. असे असले तरी जो काही पाऊस झाला, त्यावरच शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ ठेवली आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचे ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी २४ जुलै पर्यंत जिल्ह्यात तब्बल ७ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तर यावर्षी आतापर्यंत ६ लाख २१ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे तंत्र अधिकारी पी. बी. बनसावीडे यांनी सांगितले. पेरणीचा हा आकडा सरासरी पेक्षा अधिक असला तरी आवश्यक त्या प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावषी २४ जुलैपर्यंत जवळपास एक लाख हेक्टरवर कापसाचे क्षेत्र कमी आहे. कापसासह सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर आदी पिकांचा पेराही यावर्षी पावसाअभावी कमालीचा घटला आहे. बाजरी, ज्वारी या पिकांचा पेरा घटल्याने धान्य उत्पादन तर घटणारच आहे, शिवाय जनावरांसाठी कडबाही उपलब्ध होणार नसल्याचे मत शेतकरी गंगाधर तळेकर यांनी व्यक्त केले. गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी या परिसरात पावच अगदीच अत्यल्प आहे. जिल्ह्याच्या सरासरीने जरी शंभरी ओलांडली असली तरी काही तालुक्याने अद्याप ५० मि.मी. ही पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे़पेरा आणखी वाढण्याची शक्यतापीक२०१४२०१३ कापूस३३८९००४१०४००ज्वारी१३१००१९७००बाजरी७४२००९२४००मका६७००१४३००तूर३१४००४०७००मूग७४००१३९००उडीद७५००१५१००सोयाबिन१३२९९९१३३४००भुईमूग१६८१४२००सूर्यफूल३२९८००तीळ१५३८२१००कारळ३४५९००भात३००७००जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आर. एस. भताने म्हणाले की, आतापर्यंत पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असला, तरी येत्या काही दिवसांमध्ये खरिपाच्या पेरणीचे क्षेत्र आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. ज्या शेतकऱ्याने पेरा केलेला आहे, त्यांनी पीक विमाही भरावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.१०० मि़मी़ पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करु नयेत, असे आवाहन भताने यांनी केले आहे़