शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST

नांदेड : मृग नक्षत्र सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

नांदेड : मृग नक्षत्र सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु उशिरा झालेल्या पावासामुळे जिल्ह्यातील काही भागातील पेरण्या होऊ शकल्या नसल्याने जवळपास ४० हजार एकर क्षेत्र पेरणीअभावी शिल्लक राहिले आहे. यापूर्वी अधून-मधून बरसणाऱ्या पावसावरच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढावले. तर काही शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरण्या केल्या. जिल्ह्यात २८ आॅगस्टपर्यंत ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून आजघडीला खरीपातील ७ टक्के क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले आहे.जिल्ह्यात ७ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रास्तावित आहे. यापैकी २८ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरा झाला असून अद्यापही ४० हजार एकरवर पावसाअभावी पेरण्या झाल्याच नाहीत. आता पाऊस पडला असला तरी पेरणीचा हंगाम संपल्यामुळे पेरणी करुनही पीक हातात पडेल की, नाही याची शाश्वती नाही, यामुळे उर्वरित असलेल्या क्षेत्रावर पेरणी होणे शक्य नाही. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ७२ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०८ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख ६०७०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या १५१ टक्के प्रमाण आहे. तूर ५४ हजार ६०० हेक्टर, उडिद २० हजार ७०० हेक्टर, मूग १९ हजार ८०० हेक्टर, ज्वारी ५७ हजार ३०० हेक्टर व इतर पिकांच्या अशा एकूण ९३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.यातील जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केलेली आहे.गतवर्षी सप्टेबर महिन्यात पीके मोठी होऊन डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याने दुबार-तिबार पेरणी करुनही पिके समाधानकारक नाहीत. तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र असे- नांदेड २७२०० हेक्टर, अर्धापूर २१३००, मुदखेड १८ हजार, लोहा ६६८००, कंधार ५०२००, देगलूर ४८८००, मुखेड ७६५००, नायगांव ४१४००, बिलोली ४३ हजार हेक्टर, धर्माबाद २३३००, किनवट ७३७००, माहूर ३२६००, हदगांव ७५१००, हिमायतनगर २७८००, भोकर ४६९०० हेक्टरवर तर उमरी तालुक्यात ३०५०० हेक्टरवर पेरणी झालेली आहे.यापुढे पाऊस पडला तरी पेरणी केलेले पीक येण्याचा हंगाम संपल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलीतरी उत्पादन चागंले येण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगल उभा राहिला आहे.(प्रतिनिधी)पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ७२ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०८ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख ६०७०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.