शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST

नांदेड : मृग नक्षत्र सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

नांदेड : मृग नक्षत्र सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु उशिरा झालेल्या पावासामुळे जिल्ह्यातील काही भागातील पेरण्या होऊ शकल्या नसल्याने जवळपास ४० हजार एकर क्षेत्र पेरणीअभावी शिल्लक राहिले आहे. यापूर्वी अधून-मधून बरसणाऱ्या पावसावरच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढावले. तर काही शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरण्या केल्या. जिल्ह्यात २८ आॅगस्टपर्यंत ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून आजघडीला खरीपातील ७ टक्के क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले आहे.जिल्ह्यात ७ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रास्तावित आहे. यापैकी २८ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरा झाला असून अद्यापही ४० हजार एकरवर पावसाअभावी पेरण्या झाल्याच नाहीत. आता पाऊस पडला असला तरी पेरणीचा हंगाम संपल्यामुळे पेरणी करुनही पीक हातात पडेल की, नाही याची शाश्वती नाही, यामुळे उर्वरित असलेल्या क्षेत्रावर पेरणी होणे शक्य नाही. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ७२ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०८ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख ६०७०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या १५१ टक्के प्रमाण आहे. तूर ५४ हजार ६०० हेक्टर, उडिद २० हजार ७०० हेक्टर, मूग १९ हजार ८०० हेक्टर, ज्वारी ५७ हजार ३०० हेक्टर व इतर पिकांच्या अशा एकूण ९३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.यातील जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केलेली आहे.गतवर्षी सप्टेबर महिन्यात पीके मोठी होऊन डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याने दुबार-तिबार पेरणी करुनही पिके समाधानकारक नाहीत. तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र असे- नांदेड २७२०० हेक्टर, अर्धापूर २१३००, मुदखेड १८ हजार, लोहा ६६८००, कंधार ५०२००, देगलूर ४८८००, मुखेड ७६५००, नायगांव ४१४००, बिलोली ४३ हजार हेक्टर, धर्माबाद २३३००, किनवट ७३७००, माहूर ३२६००, हदगांव ७५१००, हिमायतनगर २७८००, भोकर ४६९०० हेक्टरवर तर उमरी तालुक्यात ३०५०० हेक्टरवर पेरणी झालेली आहे.यापुढे पाऊस पडला तरी पेरणी केलेले पीक येण्याचा हंगाम संपल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलीतरी उत्पादन चागंले येण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगल उभा राहिला आहे.(प्रतिनिधी)पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ७२ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०८ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख ६०७०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.