शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

मराठवाड्यातील नगरपालिकांचे स्रोत आटले

By admin | Updated: May 21, 2016 00:14 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण भागात ज्याप्रमाणे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तशीच परिस्थिती शहरी भागातही निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण भागात ज्याप्रमाणे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तशीच परिस्थिती शहरी भागातही निर्माण झाली आहे. विभागातील नगरपालिका क्षेत्रातील जलस्रोत आटले असून, टँकरद्वारेच नगरपालिकांना नागरिकांना पाणीपुरवठा करावा लागतो आहे. टँकरसाठी अतिरिक्त निधी उभा करणे हे नगरपालिकांना जड जात आहे. नगरपालिकांच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था होत असली तरी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. ४० कि़ मी. लांब किंवा त्याहून अधिक दूरवरून टँकर भरण्यात येत आहेत. त्यामुळे टँकरचा खर्च वाढू लागला आहे. जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर नगरपालिका परिसरात पाण्याची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. नगरपालिकांचे पाणीपुरवठा करण्याचे पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहे. उदगीर नगरपालिकेला ४० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लोहा, मुखेड, भोकर, माहूर, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, औसा, चाकूर, जळकोट, शिरूर अनंतपाळ, देवणी, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, कळंब या नगरपालिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. जवळपास सर्वच नगरपालिकांचे स्रोत आटले आहेत. तर काही पालिकांच्या जलस्रोतात आठ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धारूर, केज, निलंगा, अहमदपूर, चाकूर, जळकोट, कळंब व परंडा नगरपालिकांमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कन्नड, पूर्णा, मानवत नगरपालिकांना ८ दिवसांआड तर वैजापूर, गंगापूर, देगलूर, लोहा, भोकर, माहूर, गेवराई, कंधार या नगरपालिकांना चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यातील ५३ नगरपालिकांच्या पाणीटंचाईचा आराखडा नगरपालिका प्रशासनाने केला होता. मात्र, पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे पाणीपुरवठा करायचा कसा, याचे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.