शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

मराठवाड्यातील नगरपालिकांचे स्रोत आटले

By admin | Updated: May 21, 2016 00:14 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण भागात ज्याप्रमाणे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तशीच परिस्थिती शहरी भागातही निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण भागात ज्याप्रमाणे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तशीच परिस्थिती शहरी भागातही निर्माण झाली आहे. विभागातील नगरपालिका क्षेत्रातील जलस्रोत आटले असून, टँकरद्वारेच नगरपालिकांना नागरिकांना पाणीपुरवठा करावा लागतो आहे. टँकरसाठी अतिरिक्त निधी उभा करणे हे नगरपालिकांना जड जात आहे. नगरपालिकांच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था होत असली तरी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. ४० कि़ मी. लांब किंवा त्याहून अधिक दूरवरून टँकर भरण्यात येत आहेत. त्यामुळे टँकरचा खर्च वाढू लागला आहे. जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर नगरपालिका परिसरात पाण्याची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. नगरपालिकांचे पाणीपुरवठा करण्याचे पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहे. उदगीर नगरपालिकेला ४० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लोहा, मुखेड, भोकर, माहूर, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, औसा, चाकूर, जळकोट, शिरूर अनंतपाळ, देवणी, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, कळंब या नगरपालिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. जवळपास सर्वच नगरपालिकांचे स्रोत आटले आहेत. तर काही पालिकांच्या जलस्रोतात आठ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धारूर, केज, निलंगा, अहमदपूर, चाकूर, जळकोट, कळंब व परंडा नगरपालिकांमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कन्नड, पूर्णा, मानवत नगरपालिकांना ८ दिवसांआड तर वैजापूर, गंगापूर, देगलूर, लोहा, भोकर, माहूर, गेवराई, कंधार या नगरपालिकांना चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यातील ५३ नगरपालिकांच्या पाणीटंचाईचा आराखडा नगरपालिका प्रशासनाने केला होता. मात्र, पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे पाणीपुरवठा करायचा कसा, याचे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.