शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

आत्मा कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले

By admin | Updated: July 20, 2016 00:27 IST

औरंगाबाद : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत कार्यरत जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत.

औरंगाबाद : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत कार्यरत जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे सध्या हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या हेतूने राज्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हास्तरावर या प्रकल्पाचे स्वतंत्र कार्यालय आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मात्र चालू वर्षी निधी न मिळाल्यामुळे आत्माच्या जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जिल्ह्यात आत्मा अंतर्गत एकूण चार अधिकारी आणि २२ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ९ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, १२ विषय विशेषतज्ज्ञ आणि १ कॉम्प्युटर प्रोग्राम यांचा समावेश आहे. या सर्वांना एप्रिलपासून आतापर्यंत पगार मिळालेला नाही. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. आत्माचे प्रकल्प संचालक एस. एम. सोळुंके यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, निधीअभावी पगार रखडले होते. मात्र नुकताच ३३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच या कर्मचाऱ्यांचे पगार होतील. केवळ कर्मचाऱ्यांचेच नव्हे तर अधिकाऱ्यांचेही पगार रखडले होते, असेही त्यांनी नमूद केले.