शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

आत्मा कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले

By admin | Updated: July 20, 2016 00:27 IST

औरंगाबाद : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत कार्यरत जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत.

औरंगाबाद : कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) अंतर्गत कार्यरत जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. त्यामुळे सध्या हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या हेतूने राज्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. जिल्हास्तरावर या प्रकल्पाचे स्वतंत्र कार्यालय आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. मात्र चालू वर्षी निधी न मिळाल्यामुळे आत्माच्या जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जिल्ह्यात आत्मा अंतर्गत एकूण चार अधिकारी आणि २२ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ९ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, १२ विषय विशेषतज्ज्ञ आणि १ कॉम्प्युटर प्रोग्राम यांचा समावेश आहे. या सर्वांना एप्रिलपासून आतापर्यंत पगार मिळालेला नाही. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. आत्माचे प्रकल्प संचालक एस. एम. सोळुंके यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, निधीअभावी पगार रखडले होते. मात्र नुकताच ३३ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे लवकरच या कर्मचाऱ्यांचे पगार होतील. केवळ कर्मचाऱ्यांचेच नव्हे तर अधिकाऱ्यांचेही पगार रखडले होते, असेही त्यांनी नमूद केले.