शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

लवकरच दररोज पाणी

By admin | Updated: February 18, 2016 00:08 IST

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. जायकवाडी धरणातून एक थेंबही अतिरिक्त पाणी न घेता दररोज पाणी कसे देता येईल, याचे नियोजन करणे सुरू केले आहे. शहरातील अंतर्गत लिकेजेस बंद करून नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याचे केंद्रेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले.मागील काही वर्षांपासून मनपा शहराला दोन दिवसांआड पाणी देत आहे. प्रत्यक्षात नागरिकांना आठवड्यातून दोनदाच पाणी मिळते. शहराबाहेर अनेक वसाहतींना मनपा पाणी देण्यास असमर्थता दर्शवीत आहे. नवीन वसाहतींना किमान टँकरने तरी पाणी मिळावे, अशी रास्त अपेक्षा नागरिकांची आहे. त्यातच सातारा-देवळाई परिसर मनपाच्या ताब्यात आल्याने या भागातील ४०-४५ हजार नागरिकांना पाणी देण्याचे दायित्व मनपावर येऊन पडले आहे. जायकवाडी धरणात सध्या ३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यातील सुमारे ४० टीएमसी पाणी मनपाला पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपयुक्त साठा संपल्यावर मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. २०१२ मध्ये जशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्कालीनचे सहा पंप तयार ठेवण्याचे आदेश केंद्रेकर यांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसह मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.शहरातील ११३ वॉर्डांमध्ये लिकेज खूप आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. लिकेजेस बंद करून दररोज पाणी नागरिकांना कसे देता येईल, यावर अधिक भर देण्यात आला आहे. मनपा पाण्याचा अपव्यय टाळून ते नागरिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे. कारण त्यांचा तो हक्कआहे, असेही केंद्रेकर यांनी नमूद केले. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यावरून वाद निर्माण होतात. यंदा उन्हाळ्यात पाणीपुरवठा जास्तीत जास्त सुरळीत कसा राहील, यावरही मनपा अधिक भर देणार आहे.