शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

लवकरच दररोज पाणी

By admin | Updated: February 18, 2016 00:08 IST

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. जायकवाडी धरणातून एक थेंबही अतिरिक्त पाणी न घेता दररोज पाणी कसे देता येईल, याचे नियोजन करणे सुरू केले आहे. शहरातील अंतर्गत लिकेजेस बंद करून नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याचे केंद्रेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले.मागील काही वर्षांपासून मनपा शहराला दोन दिवसांआड पाणी देत आहे. प्रत्यक्षात नागरिकांना आठवड्यातून दोनदाच पाणी मिळते. शहराबाहेर अनेक वसाहतींना मनपा पाणी देण्यास असमर्थता दर्शवीत आहे. नवीन वसाहतींना किमान टँकरने तरी पाणी मिळावे, अशी रास्त अपेक्षा नागरिकांची आहे. त्यातच सातारा-देवळाई परिसर मनपाच्या ताब्यात आल्याने या भागातील ४०-४५ हजार नागरिकांना पाणी देण्याचे दायित्व मनपावर येऊन पडले आहे. जायकवाडी धरणात सध्या ३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यातील सुमारे ४० टीएमसी पाणी मनपाला पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपयुक्त साठा संपल्यावर मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. २०१२ मध्ये जशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्कालीनचे सहा पंप तयार ठेवण्याचे आदेश केंद्रेकर यांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसह मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.शहरातील ११३ वॉर्डांमध्ये लिकेज खूप आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. लिकेजेस बंद करून दररोज पाणी नागरिकांना कसे देता येईल, यावर अधिक भर देण्यात आला आहे. मनपा पाण्याचा अपव्यय टाळून ते नागरिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे. कारण त्यांचा तो हक्कआहे, असेही केंद्रेकर यांनी नमूद केले. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यावरून वाद निर्माण होतात. यंदा उन्हाळ्यात पाणीपुरवठा जास्तीत जास्त सुरळीत कसा राहील, यावरही मनपा अधिक भर देणार आहे.