शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत टीकेची झोड उठताच ‘नाना’ आंदोलकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:56 IST

राजकीय वर्तुळातून आणि सोशल मीडियातून फुलंब्री मतदारसंघामुळे शहराची कचराकोंडी झाली, अशी टीका होण्यास सुरुवात होताच रविवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी नारेगाव कचरा डेपो हटावच्या विरोधात आंदोलन करणाºयांची भेट घेऊन मनपाला सहा महिन्यांची मुदत देण्याची विनंती केली. आंदोलकांनी त्यांची विनंती धुडकावून लावली.

ठळक मुद्देकचराकोंडीचा दहावा दिवस : एकमेकांवर कचराफेक; राजकीय दबावामुळे शहर दहा दिवसांपासून कच-यात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राजकीय वर्तुळातून आणि सोशल मीडियातून फुलंब्री मतदारसंघामुळे शहराची कचराकोंडी झाली, अशी टीका होण्यास सुरुवात होताच रविवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (नाना) यांनी नारेगाव कचरा डेपो हटावच्या विरोधात आंदोलन करणाºयांची भेट घेऊन मनपाला सहा महिन्यांची मुदत देण्याची विनंती केली. आंदोलकांनी त्यांची विनंती धुडकावून लावली.शहरात चार हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक कचरा पडून आहे. दहाव्या दिवशीही शहराची कचराकोंडी कायम आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचराकोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना मध्यस्थी पाठविले. सावंत यांची मध्यस्थी निष्फळ ठरली. शनिवारी २४ खा. चंद्रकांत खैरे,आ. संजय शिरसाट यांनीही आंदोलकांची भेट घेतली. खैरेंनी आंदोलकांना मनपाला सहकार्य करण्याची विनंती केली, शिवाय विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यावर आरोपही केले. खैरे जाऊनही आंदोलकांनी माघार घेतली नाही. त्यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मनपाला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याची मागणी केली. यावेळी महापौर नंदकुमार घोडेलेंसह सर्व पदाधिकारी, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर आदी उपस्थित होते.आमचा मनपावर भरोसा नायपालिकेला चार महिन्यांची मुदत दिली होती. पालिकेने काहीही केले नाही. त्यामुळे पालिकेवर आमचा भरोसा नाही. चाळीस वर्षांपासून ग्रामस्थ कचरा डेपोच्या यातना भोगत आहेत. डेपो येथून हटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. कुठल्याही स्थितीत मुदत वाढवून देणार नाही,असे आंदोलकांनी बागडेंना सुनावले.राजकारणाचा विषय नाहीआंदोलकांशी झालेल्या चर्चेनंतर बागडे म्हणाले, कचरा डेपो हा राजकारणाचा विषय नाही. निवडणुकीपुरते राजकारण करावे लागते. सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी जनतेशी राजकारण करता येत नाही. पालिकेला मुदतवाढ देण्याच्या मन:स्थितीत आंदोलक आहेत, असा दावा त्यांनी केला. कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी पर्यावरण विभागासह इतर विभागांच्या परवानग्या लागतात. कचºयापासून खत निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जाईल.आंदोलनाचा निर्धार कायमआंदोलकांना बागडे यांनी सहा महिन्यांची मुदत देण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी बैठक घेतली. पालिकेने जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबत आंदोलक, ग्रामस्थांनी याबद्दल रोष व्यक्त केला. बागडे यांची मध्यस्थी मान्य नसल्यामुळे आंदोलन सुरूठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे, असे आंदोलकांनी सांगितले. उद्या सकाळपर्यंत काहीतरी निर्णय होण्याचे संकेतही आहेत.मविसेचे बुधवारीगुलमंडीवर आंदोलनयेत्या २८ फेब्रुवारी रोजी मराठवाडा विकास सेनेतर्फे गुलमंडीवर शहरातल्या कचराकोंडीविरुद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मविसेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांनी आज येथे एका पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांनी मनपाच्या कारभारावर सडकून टीका केली. शहराला पिण्याच्या पाण्याची आज तीव्र टंचाई जाणवत आहे, अशा स्थितीत समांतर पाणीपुरवठा योजना केवळ शासनाच्या जीवन विकास प्राधिकरण व मनपाच्या माध्यमातून तातडीने सुरूकरायला पाहिजे, असेही पाटील म्हणाले. यावेळी अविनाश कुमावत, रमेश सुपेकर, सदानंद शेळके आदींची या परिषदेस उपस्थिती होती.बागडे आंदोलकांना म्हणालेगेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरूआहे. यापूर्वीही युती सरकारच्या काळात मी मंत्री असताना कचरा डेपोसाठी आंदोलन झाले होते. त्यावेळी संरक्षण भिंत बांधून घेतली. यावर्षी पुन्हा ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. आंदोलन करणे हा आपला हक्क आहे. न्यायालयात जाण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात येऊन न्याय मागावा, अशी माझी भूमिका आहे. पालिकेने चार महिन्यांत प्रयत्न केले. मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे प्रक्रिया प्रकल्प उभा राहिला नाही. त्यामुळे सहा महिन्यांचा वेळ द्यावा, अशी विनंती बागडे यांनी आंदोलकांना केली.मनपाचा घातला ‘दहावा’नारेगाव कचरा डेपोच्या विरोधात आंदोलन सुरू असून, रविवारी आंदोलकांनी मनपाचा निषेध करीत दहावा घातला. दहाव्याचा विधिवत कार्यक्रम करीत मुंडन करून आंदोलकांनी मनपाचा निषेध केला. कचरा डेपो हटविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी केला. ३२ वर्षांपासून नारेगाव-मांडकी शिवारात पालिकेचा कचरा डेपो आहे. कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.डेपो तेथून हटविण्याच्या मागणीसाठी परिसरातील १४ गावांच्या नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. रविवारी या आंदोलनाला दहा दिवस पूर्ण झाले. दहा दिवसांपासून शहरातील कचºयाची गाडी आंदोलकांनी डेपोत जाऊ दिली नाही. त्यामुळे शहराची कचराकोंडी झाली आहे. पुंडलिकअप्पा अंभोरे, डॉ. शिवाजी डक, मनोज गायके, माजी पंचायत समिती सभापती सुनील हरणे आदींचा आंदोलकांमध्ये समावेश आहे.